HW News Marathi
राजकारण

पलूस-कडेगाव पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार

सांगली | पलूस-कडेगाव पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्यामुळे काँग्रेसचे उमेदवार असलेल्या विश्वजीत कदम यांचा मार्ग मोकळा झाला आहे. संग्रामसिंह देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज सोमवारी मागे घेतला. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे पलूस-कडेगाव विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी २८ मे रोजी मतदान तर ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे. रिक्त झालेल्या जागी काँगेसकडून यापूर्वीच युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांना विरोध म्हणून भाजपनेही जिल्हा परिषदेचे विद्ममान अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचा अर्ज दाखल करुन खळबळ उडवून दिली होती. तर दुसरीकडे शिवसेनेने विश्वजित कदम यांना जाहीर पाठिंबा दिला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिंदे-फडणवीस सरकारचा पहिलं अर्थसंकल्प सादर होणार; शेतकरी, मध्यमवर्गीयांच्या वाटेला काय येणार?

Aprna

महामंडळाच्या नियुक्त्या जाहीर

News Desk

मी नुसते राजीव गांधींचे नाव घेतले अन् त्यांच्या पोटात जोरदार दुखू लागले !

News Desk