HW News Marathi
अर्थसंकल्प

#Budget2019 : आता शेतकऱ्यांच्या खात्यात येणार दरवर्षी ६ हजार रुपये

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी ‘प्रधान मंत्री किसान सन्मान निधी‘ची घोषणा करण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत २ हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये खात्यात जमा करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे. या योजनेचा फायदा जवळपास १२ कोटी शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना होणार आही ही योजना लागू करण्यासाठी वर्षाला ७५ हजार कोटी रुपये ऐवढा खर्च येणार आहे. हा सर्व खर्च केंद्र सरकार करणार असल्याचे गोयल यांनी सांगितले. अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी आज (१ फेब्रुवारी) संसदेत सादर केला.

या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतपिकांना चांगला भाव मिळत नव्हता. त्यासाठी २२ शेतपिकांच्या किमान आधारभूत किंमत दीडपटीने वाढविली आहे. हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे. तसेच शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला तर त्या शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज योजनेतर्गंत २ टक्के व्याज सवलत देण्यात येणार आहे. यामुळे शतकरी वेळेत कर्जाची परतफेड करेन आणि तसे केल्यास त्यांना ३ टक्के व्याजात सवलत मिळणार असल्याचे गोयल यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Budget 2019 LIVE Updates :  सोने,चांदी, पेट्रोल-डिझेल महागणार

News Desk

Budget 2019 : नवभारताची संकल्पना आणखी विस्तारणारा अर्थसंकल्प | मुख्यमंत्री 

News Desk

PFB : मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्प अधिवेशनाची तारीख जाहीर

News Desk