HW News Marathi
राजकारण

#RamMandir : राम मंदिर उभारणीला विरोध केला, तर सरकार पाडू !

नवी दिल्ली | राम मंदिर मुद्यांवरून भाजपचे राज्यसभेतील खादार सुब्रमण्यम स्वामी देखील अपवाद राहिले नाही. सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपला घराचा आहेर दिला आहे. सुब्रमण्यम म्हटले की, केंद्रातील नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिर उभारणीला विरोध केला, तर दोन्ही सरकार पाडू, अशा इशारा सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुब्रमण्यम स्वामी यांनी हा इशारा दिला. ‘राम मंदिर उभारणीचे प्रकरण जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालय पटलावर येणार आहे. आम्ही दोन आठवड्यात जिंकू, केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार हे दोन्ही पक्षकार आमचे विरोधक आहेत. मला विरोध करण्याची त्यांची हिंमत आहे का? जर त्यांनी मला विरोध केला तर मी सरकार पाडेन. मात्र ते मला विरोध करणार नाहीत हे मला माहीत आहे’, असे स्वामी म्हणाले आहेत.

तसेच अयोध्येत राम मंदिर उभारण्यास मुस्लिम समाजाचा विरोध नसल्याचा दावा ही स्वामी यांनी केला आहे. काही मुस्लिमांशी मी व्यक्तीगत भेट घेतली तेव्हा त्यांनी राम मंदिर उभारणीस विरोध नसल्याचे स्पष्ट केल्याचंही ते म्हणाले. मुघल सम्राट बाबरने ताब्यात घेतलेला हा भूखंड आमचा आहे, असे सुन्नी वक्फ बोर्डाने म्हटले आहे. पण त्या जागेवर पुन्हा मशीद उभारायची आहे, असे त्यांनी म्हटले नाही, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतल्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला मारहाण

News Desk

मोदींनी ५ उद्योजकांचे ३.५ लाख कोटींचे कर्ज माफ केले !

Gauri Tilekar

‘साद घातली तर येऊ देत…,’ शर्मिला ठाकरेचे सूचक विधान

Aprna