HW News Marathi
राजकारण

‘ईव्हीएम’वर अविश्वास म्हणजे जनतेवर अविश्वास, मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला

वर्धा | ‘ईव्हीएम’च्या मुद्द्यावर विरोधकांची एकजूट होऊन काहीही फरक पडणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ईव्हीएम विरोधी पत्रकार परिषदेवर टीका केली आहे. ‘ईव्हीएम’वर अविश्वास म्हणजे जनतेवर अविश्वास, असा टोला मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेद्वारे महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज (२ ऑगस्ट) वर्ध्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला अभूतपूर्व विजय मिळेल असल्याचा दावा देखील मुख्यमंत्र्यांनी केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादींच्या नेते आणि कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी काही पक्ष त्यांना शपथा देता आहेत. परंतु आता पक्षात शपथ घेणारे तरी राहिलेत का?, असा सवाल विचार मुख्यमंत्र्यांनीराष्ट्रवादी काँग्रेसला चिमटे काढले आहे.

यावेळी महाजनादेश यात्रेच्या सुरुवातीलच जनतेने भरगोस प्रतिसाद मिळाणे म्हणजे पाच वर्षात केलेल्या कामाची पोचपावतीच असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेकजण पक्षात येण्यास इच्छुक आहेत. पण काही लोकांनाच प्रवेश दिल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्र्यांनी अजूनही भाजपमध्ये भरती सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. विदर्भातील चांगले नेते पक्षात येणार असतील, तर त्यांचे स्वागत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राफेलवर झालेल्या स्वार्थी राजकारणामुळे देशाचे मोठे नुकसान, पंतप्रधान मोदींची टीका

News Desk

राज ठाकरेंच्या फक्त सभांना गर्दी, पण मते आम्हालाच !

Gauri Tilekar

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज २८ वी पुण्यतिथी

News Desk