HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्री फडणवीसांनी का फिरवली पाठ ?

मुंबई | अमृता फडणवीस यांचा क्रुझवर काढलेला वादग्रस्त सेल्फी सोशल मिडीयावर सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरला आहे. या सेल्फीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सेल्फीसाठी नसते धाडस केल्याचे समोर आले आहे. शनिवार २० ऑक्टोबर २०१८ रोजी मुंबई-गोवा क्रूझ सेवेचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी क्रूझच्या टोकाला बसून सेल्फी काढण्याचा मोह अमृता यांना आवरता आला नाही. त्यांच्या या वादग्रस्त सेल्फीवर मुख्यमंत्री फडणवीस यांची काय प्रतिक्रीया असेल किंवा मुख्यमंत्री फडणवीस यांना या प्रकरणाची काहीच कल्पाना नसेल का असा सवालही अनेकांनी उपस्थित केला. तसेच अमृता यांच्या या सेल्फीनंतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांना बायकोकडे लक्ष द्या असा खोचक सल्ला देखील अनेकांनी दिला आहे.

परंतु सदर सेल्फीच्या वेळी अमृता फडणवीस सेल्फी घेत असताना मुख्यमंत्री फडणवीस पाठ फिरवून उभे असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अमृता फडणवीस जेव्हा धोकादायक जागेवर बसून सेल्फी घेत होत्या तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी देखील उपस्थित असल्याचे पहायला मिळत आहे. दस्तुरखुद्द राज्याचे मुख्यमंत्री सदर ठिकाणी उपस्थित होते तरीही त्यांनी या सेल्फी प्रकरणाला विरोध का केला नाही. हा प्रश्न पेच निर्माण करणारा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

काँग्रेस पक्षाने कारवाई करत सत्यजीत तांबे यांना केले निलंबित; नाना पटोलेंची माहिती

Aprna

#LokSabhaElections2019 : मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अचानक जानकरांचा सूर बदलला !

News Desk

छत्तीसगडमध्ये नवे पर्व

News Desk
राजकारण

मोदींच्याच नेतृत्वातील एन डी ए सरकारला जनता पुन्हा संधी देणार | आठवले

News Desk

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी आगामी निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सरकार जाणार असल्याच्या व्यक्त केलेल्या मताशी आपण सहमत नसल्याचे सांगत सन २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी ( एनडीए ) सरकारला जनता पुन्हा निवडून देईल असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज व्यक्त केला.

देशाच्या विकासासाठी सबका साथ सबका विकास हे मोदींचे सूत्र योग्य ठरले असून त्यानुसार विकासासाठी पुन्हा जनता मोदींच्याच नेतृत्वातील एन डी ए सरकारला संधी देणार आहे. देशासमोर एन डी ए हाच समर्थ पर्याय आहे. विरोधकांच्या एकजुटीला फुटीचे ग्रहण लागले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वात देशाला स्थिर आणि विकसनशील सरकार मिळू शकते असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचे उत्तुंग व्यक्तीमत्व होते. त्यांचा वारसा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चालवीत असून लोकप्रिय सक्षम प्रधानमंत्री ते ठरले आहेत. काँग्रेस च्या नेतृत्वातील युपीए सरकारने जे निर्णय घेण्याची हिम्मत केली नाही ती हिम्मत मोदी सरकारने दाखविली आहे.पाकिस्तानचे कंबरडे मोडणारा सर्जिकल स्ट्राईक मोदी सरकारने केला आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी काँग्रेस ने इंदूमिल ची जमीन देण्यास टाळटाळ केली मात्र प्रधानममंत्री नरेंद्र मोदींनी त्वरित निर्णय घेऊन इंदूमिल ची जमीन स्माकासाठी हस्तांतरित केली.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचे पंचतीर्थ स्थळ विकसित करण्यात आली आहेत.दिल्लीतील २६ अलीपुर रोड निर्वाणभूमी स्मारक;नागपूरातील दीक्षाभूमी ; महू येथील जन्मभूमी ;मुंबईतील चैत्यभूमी इंदूमिल मधील स्मारक तसेच लंडन मधील हेन्री रोड वरील स्मारकांचा विकास करण्यात आला आहे.उज्वला योजना तसेच अनेक सामाजिक न्यायाच्या योजना मोदींच्या नेतृत्वात राबविण्यात आल्या आहेत. रस्ते विकसाचे अनेक प्रकल्प उभारले आहेत. अनेक लोकप्रिय निर्णय मोदी सरकारने घेतले असून आगामी निवडणुकीत जनता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारला पुन्हा निवडुन देणार असल्याचा दृढ विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

 

Related posts

आज संध्याकाळी एनडीएच्या नेत्यांची बैठक अन् डीनर पार्टी

News Desk

“आदित्य ठाकरेंचे शिवसेनेसाठी योगदान काय?,” रामदास कदमांचा सवाल

Aprna

मध्य प्रदेशाच्या निवडणुकीत पक्षांचे स्टार प्रचारक मैदानात

News Desk