HW News Marathi
राजकारण

“शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना कधी दिल्लीत यावे लागले नाही,” संजय राऊतांचा टोला

मुंबई | “शिवसेनेच्या (Shiv Sena) मुख्यमंत्र्यांना कधी दिल्लीत यावे लागले नाही. शिवसेनेचे हायकमांड ते कायम मुंबई राहिले आणि मुंबईतच चर्चा झाली, “असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)Eknath Shinde यांना लगावला आहे. राऊतांनी आज (28 जुलै) दिल्लीतील निवसास्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राऊतांनी शिंदे गटातील 16 आमदार अपात्र, सर्वोच्च न्यायालय, मुख्यमंत्र्यांची दिल्ली वारी आदी मुद्यांवर मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली.

संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रातील मुख्यमंत्री  वर्षातून चार वेळाही दिल्लीत आले नाही. परंतु, सध्याच्या मुख्यमंत्र्यांना महिन्यातून चार वेळा दिल्लीला यावे लागते. याबाबात महाराष्ट्राच्या मनामध्ये  खूप गोंधळ आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून जर कोणी घेत असतील. तर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याना कधी दिल्लीत यावे लागले नाही. शिवसेनेचे हायकमांड हे कायम मुंबई राहिले आणि मुंबईतच चर्चा झाली. पण आता आमच्या मुख्यमंत्र्यांना पाच वेळा दिल्लीत यावे लागते.  बहुतेक ते आपला मुक्काम दिल्लीत हलवितील की काय, असे राज्यातील जनतेला वाटू लागले,” असा टोलाही राऊतांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन

शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेवर राऊत म्हणाले, “16 आमदार अपात्र ठरतील, हे नक्की किंवा त्यांना स्वत:च्या बचाव करण्यासाठी दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे लागेल. मग ते स्वत: शिवसैनिक कसे म्हणणार. शिंदे गटाला एका पक्षाचा आसदार घालावा लागेल. अशा वेळी यातील किती आमदार दुसऱ्या पक्षात विलीन होण्यास तयार आहेत. यांची संपूर्ण कल्पना आमच्याकडे आहे. आमदार आमच्या संपर्कात आहेत. भविष्यामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाले. तीर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही,” असे भाकीत त्यांनी वर्तवली आहे.

शिंदे गटावर सर्वोच्च न्यायालयाच्या कारवाईची टांकती तलवार

“महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेशी तसा संबंध नाही. सतत त्यांना दिल्लीला यावे लागते. यातच महाराष्ट्राच्या स्वाभिमान आणि अभिमानाला किती ढेच लागते. ते आपल्याला कळते, ते अद्याप सरकार बनवू शकले नाही,” असे म्हणत राऊतांनी शिंदेच्या दिल्ली वारीवर निशाणा साधला. राऊत पुढे म्हणाले, “शिंदे गटावर सर्वोच्च न्यायालयाच्या कारवाईची टांकती तलवार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये तणावतायी वेळापत्रक आहे त्यांचा अभ्यास केला. एक तर 16 आमदारांना अपात्र ठरवले जाईल. त्याआधी शिंदे गटाच्या आमदारांना कोणत्या तरी एका पक्ष्यात स्वत:ला शिवसैनिक कसे म्हणून घेणार आहेत. ठाकरेंऱ्यांचे  सैनिक, आम्ही बाळासाहेब ठाकरे अनुयायी कसे म्हणून घेणार हा एक प्रश्न आहे.”

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी जमीन हस्तांतरित करा !

Gauri Tilekar

कंपास पेटीच्या साहाय्याने ८ वर्षीय मुलीने शिकविला ‘राफेल’ धडा

News Desk

दुष्काळाबाबत केंद्र-राज्य सरकार गंभीर नाही !

News Desk