HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्र्यांनी देशातील जनतेची माफी मागावी !

मुंबई | रमाकांत आचरेकरसरांना भारत सरकारने पद्मश्रीने सन्मानित केले होते. त्यांच्या निधनानंतर सरकारची जबाबदारी होती की,सरकारने त्यांच्यावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करायला हवे होते परंतु तसे न केल्याने सरकारचा खरा चेहरा समोर आलाय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

रमाकांत आचरेकरसर क्रिकेटचे महान कोच होते. त्यांनी सचिन तेंडूलकर आणि विनोद कांबळीसारखे महान खेळाडू या देशाला दिले आहेत असेही नवाब मलिक म्हणाले.

अभिनेत्री श्रीदेवीचे निधन झाले त्यावेळी मुख्यमंत्री धावतधावत पोचले होते.संपूर्ण भाजप त्यावेळी सक्रिय झाली होती. परंतु आचरेकरसर हे व्यक्ती महान होते त्यांचा अधिकार होता की संपूर्ण शासकीय इंतमामामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार व्हायला हवे होते. परंतु भाजप सरकार हेच विसरली आहे. या मोठया चुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी देशातील जनतेची माफी मागावी अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सहकारी बँकेच्या ग्राहकांना शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार; अमित शाहूची मोठी घोषणा

Chetan Kirdat

#LokSabhaElections2019 : प्रकाश आंबेडकरांच्या जातीवादाविरुद्धच्या संघर्षाला काय अर्थ उरतो ?

News Desk

दक्षित मुंबईतून कोळंबकरांचा युतीचे उमेदवार राहुल शेवाळेंना जाहीर पाठिंबा

News Desk
देश / विदेश

आज राम मंदिराबाबत सुनावणी

News Desk

नवी दिल्ली | अयोध्याप्रकरणीसर्वोच्च न्यायालयात आज (४ जानेवारी) सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली ३ न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबरमध्ये या प्रकरणाशी संबंधित याचिकांवर लवकर सुनावणी घेण्यास नकार दिला होता. या प्रकरणात जानेवारीपासून सुनावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायालयाकडे सध्य अन्य प्रकरणेही असल्याचे सांगितले होते. या निर्णयाविरोधात १४ पेक्षा जास्त याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने ९ मे २०११ मध्ये या निर्णयाला स्थिगिती दिली होती.

मंदिर वही बनायेंगे

लोकसभा निवडणूक जवळ येत असल्याने राम मंदिरासाठी पुन्हा मागणी जोर पकडू लागली आहे. हिंदुत्ववादी संघटना ठिकठिकाणी बैठका, सभा घेत असल्याने केंद्र सरकारवरील दबाव वाढत आहे. संघानेही राम मंदिरासाठी वेगळा कायदा आणण्याची मागणी केली आहे.

Related posts

बाबा राम रहिम व पंतप्रधान मोदींचे हेलिकॉप्टर कनेक्शन

News Desk

मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग अधिक कठीण

News Desk

महाराष्ट्रात ‘भगव्या’चं राज्य येतंय, हीच ती वेळ ! नितेश राणेंचं सूचक ट्विट

News Desk