HW News Marathi
राजकारण

मोदींजींच्या ‘या’ शोधामुळे जगभरातले नागरी वैमानिक चिंतेत !

मुंबई | “बालकोट हल्ल्याआधीचे ढगाळ वातावरण आणि पावसामुळे तद्ज्ञ हल्ल्याची तारीख बदलण्याच्या विचारात होते. मात्र, त्यावेळी भारतीय विमानांना रडारपासून वाचण्यासाठी अशा वातावरणाचा फायदा होऊ शकतो, असा सल्ला मी दिला होता”, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी बोलत होते. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या या विधानामुळे सध्या देशभरात त्यांची प्रचंड खिल्ली उडविली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींची फिरकी घेतली आहे. “मोदींजींच्या या शोधामुळे जगभरातले नागरी वैमानिक चिंतेत आहेत ! येत्या जून महिन्यापासून ते सप्टेंबरपर्यंत मान्सूनमुळे देशातील सगळ्या विमानसेवा बंद ठेवाव्या लागतील बहुदा !”, अशा शब्दात आव्हाड यांनी पंतप्रधान मोदी यांना टोला लगावला आहे.

नेमके काय म्हणाले आव्हाड ?

“ढगाळ वातावरणामुळे सर्जिकल स्ट्राईक नको म्हणणाऱ्या संरक्षण तज्ञांना मी सांगितले की ढगाळ वातावरणामुळे आपली विमाने रडारवर दिसणार नाहीत, आणि शत्रूला चुकवून परत येतील.”

– इति श्रीयुत मोदी

मोदींजींच्या या शोधामुळे जगभरातले नागरी वैमानिक चिंतेत आहेत! ढगात जर विमान रडारवर दिसलं नाही, किंवा रेडिओ तरंग तिथे पोचलेच नाहीत तर Air Traffic Controller त्यांना योग्य दिशा, उंची आणि बाकीची आवश्यक माहिती सांगणार कशी?

येत्या जून महिन्यापासून ते सप्टेंबरपर्यंत मान्सूनमुळे देशातील सगळ्या विमानसेवा बंद ठेवाव्या लागतील बहुदा!

पण घाबरू नका! या सगळ्या प्रश्नांवर आजतकच्या अंजना ओम कश्यप (2000 च्या नोटेत चीप असणाऱ्या फेम) यांनी त्यांच्याकडील जमिनीखाली 200 फुटांवरच्या नोटा शोधणारी रडार भारत सरकारला देण्याचा वायदा केलेला आहे!

– डॉ.जितेंद्र.आव्हाड

काय होते पंतप्रधान मोदींचे ‘ते’ विधान ?

”मी ९ वाजता (हवाई हल्ल्याच्या तयारीबाबत) माहिती घेतली. त्यानंतर 12 वाजता पुन्हा माहिती घेतली. तेंव्हा वातावरण अचानक खराब झालं होतं आणि ती आमच्यासमोरील मोठी समस्या होती. खूप पाऊस झाला. मी हैराण झालो, आतापर्यंत देशातील एवढे विद्वान लोक मला शिव्या घालतात, त्यांचं डोकं येथे चालत नाही. १२ वाजता…मी पहिल्यांदाच हे सांगतोय…एका क्षणासाठी आमच्या मनात आलं अशा खराब वातावरणात आपण काय करणार…ढग जातील की नाही…त्यावेळी तज्ज्ञ देखील हल्ल्याची तारीख बदलण्याच्या विचारात होते…त्यावेळी माझ्या मनात दोन विचार डोकावले…एक गोपनीयता….आतापर्यंत सर्व गोपनीय होतं… गोपनीयतेत जर काही चूक झाली तर आम्ही काही करु शकणार नव्हतो…दुसरा विचार माझ्या मनात आला…मला सर्व विज्ञान काही समजत नाही, पण ढगाळ वातावरण आहे, पाऊस पडतो, याचा आपल्याला फायदाच होऊ शकतो असा विचार माझ्या मनात आला. आपण त्यांच्या रडारपासून वाचू शकतो काय…आकाशात जमा झालेल्या ढगांचा फायदा होऊ शकतो असा माझा विचार असल्याचं मी सांगितलं…सगळे बुचकळ्यात पडले…अखेरीस मी म्हटलं…ओके जा…नंतर ते निघाले”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात येणार ते युतीचेच सरकार !

News Desk

प्रियांका चतुर्वेदी आज शिवसेनेत प्रवेश करणार

News Desk

INX Media Case: पी. चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीत आणखी चार दिवसांनी वाढ

News Desk