HW News Marathi
राजकारण

राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेचा समारोप तर लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसने कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा अशी परिवर्तन संपर्क यात्रा काढून सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. या परिवर्तन संपर्क यात्रेचा समारोप हा परळी वैजनाथ येथे २३ फेब्रुवारीला एका जाहीर सभेने होणार आहे. ही जाहीर सभा ही राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेची समारोप सभा असली तरी या सभेत लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. राष्ट्रवादीच्या या सभेला कॉंग्रेससह अन्य समविचारी पक्षांनाही पाचारण करण्यात आले आहे.

अनेक आंदोलने करत राष्ट्रवादीने ‘परिवर्तन झालंच पाहिजे, हे सरकार गेलंच पाहिजे’ ही टॅगलाईनसह निर्धार परिवर्तन यात्रा काढली. आता या परिवर्तन यात्रेचा समारोप परळी वैजनाथ येथे २३ फेब्रुवारीला होत असून राष्ट्रवादीच्या या विराट सभेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. नांदेड येथे कॉंग्रेसने आघाडीची पहिली जाहीर सभा घेतली. दुसरी सभा परळी वैजनाथ येथे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी सरकारच्या ध्येय-धोरणांवर कडाडून टीका केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुरजी पटेल यांच्या उमेदवारी अर्जावर ठाकरे गटाचा आक्षेप

Seema Adhe

सत्ता नसल्यामुळे सध्या पाण्याविना मासे अशी तुमची अवस्था

News Desk

पालकमंत्री राम शिंदे यांचा शेतक-यांना अजब सल्ला !

News Desk