HW News Marathi
राजकारण

काँग्रेसने चॅकलेट चेहरा राजकारणात आणला !

नवी दिल्ली | “काँग्रेसकडे सध्या राजकारणासाठी कुणाचा चेहरा नाही. त्यामुळे काँग्रेसकडून चॅकलेट चेहरे राजकारणात आणले जात आहेत. हा चॅकलेट चेहरा घेऊन लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.” असे वादग्रस्त विधान भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी केले आहे. प्रियांका गांधी यांनी नुकतेच पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिवपदी नियुक्ती केली आहे. यावरून भाजपने कैलास यांनी खोचक शब्दात टीका केली.

कैलास विजयवर्गीय ऐवढे बोलनच न थांबात पुढे असे देखील म्हणाले की, “काँग्रेसकडे सध्या राजकारणासाठी कुणाचा चेहरा नाही. त्यामुळे काँग्रेसकडून चॅकलेट चेहरे राजकारणात आणले जात आहेत. हा चॅकलेट चेहरा घेऊन लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कधी सलमान खान तर करिना कपूर यांच्या नावाच्या चर्चा रंगल्या. कधी काँग्रेस प्रियांका गाधी यांना राजकारणात आणले जात,” असल्याचे ते म्हणाले.

प्रियांका गांधी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून महासचिव पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. मागील अनेक वर्षांपासून प्रियांका गांधींनी राजकारणात प्रवेश करावा, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्ते करत होते. ती मागणी बुधवार (२३ जानेवारी) पूर्ण झाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचार आज थंडावणार

News Desk

मराठा आरक्षणावर पुढची सुनावणी २७ जुलैला,सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष!

News Desk

नितेश यांची आक्रमकता कायम ठेऊन आम्ही त्यांना संयमाचे धडे देऊ !

News Desk