HW News Marathi
राजकारण

कॉंग्रेसने लोकशाहीची हत्या केली | नरेंद्र मोदी  

मुंबई | माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केल्यामुळे कॉंग्रेसने लोकशाहीची हत्या केली असा आरोप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली होती या आणीबाणीला आज ४३ वर्षे पुर्ण होत आहेत. या निमित्ताने भाजप सरकार आज २५ जून हा देशभर काळा दिवस पाळणार आहे. त्यानिमित्त आज मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेऊन ४३ वर्षांपुर्वी इंदिरा गांधी यांनी केलेल्या आणीबाणी विषयी भाष्य केले.

यावेळी बोलताना मोदी म्हणाले, संविधानाला ६० वर्षे पुर्ण झाली तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. तरुणाईला घटनेप्रती आस्था निर्णाण व्हावी म्हणून संविधान आंबारीत ठेऊन मी रॅली काढली होती. आम्ही संविधानाच्या रक्षणासाठी नेहमीच पावले उचलली आहेत असेही ते यावेळी बोलताना म्हणालेत.

तसेच मोदींनी यावेळी बोलताना कॉंग्रेसवर सडकून टिका केली आहे. राजीव गांधी यांनी मीडियासाठी काय केले ? कोणते कायदे आणले ? असे अनेक प्रश्न मोदींनी यावेळी बोलताना उपस्थित केले. काँग्रेसच्या काळात किशोर कुमार यांच्या गाण्यावर बंदी घालण्यात आली होती. त्याचबरोबर एका परीवारासाठी संविधानाचा दुरुपयोग करण्यात आला असा टोलाही मोदींनी यावेळी बोलताना कॉंग्रेसला लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांची खासदार, आमदारांसह नगरसेवकांची ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक

News Desk

पंतप्रधान मोदींनी लोकांना देशभक्तीची सर्टिफिकेट वाटू नये !

News Desk

बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही

News Desk