HW News Marathi
राजकारण

कॉंग्रेसचे नेते सी. पी. जोशी यांचे वादग्रस्त विधान

नाथद्वारा | कॉंग्रेस नेते सी. पी. जोशी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. नाथद्वारा येथे झालेल्या बैठकीला संबोधित करताना कॉंग्रेस नेते व माजी मंत्री सी. पी. जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्या जातिवर प्रश्न उपस्थित केला आहे.

सीपी जोशी म्हणाले की केवळ ब्राह्मणच धर्मावर बोलू शकतात. पीएम मोदी आणि उमा भारती यांच्या जातीवर प्रश्न उपस्थित करत जोशी उपस्थितांना म्हणाले काय तुम्हाला माहीत आहे का ? उमा भारती आणि पंतप्रधान मोदी कोणत्या जातीचे आहेत. याशिवाय, राम मंदिर चळवळीशी संबंधित साध्वी ऋतंभरा यांनाही त्यांनी लक्ष्य केले आणि ते कोणत्या वंशाचे आहेत, त्यांच्या धर्माबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

याशिवाय त्यांनी सांगितले की फक्त काँग्रेस पार्टीच राम मंदिर बनवू शकेल. भाजपला लक्ष करत जोशी म्हणाले, निवडणुकीच्या काळात राम मंदिरचा मुद्दा उचलून भाजप जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहे. मंदिर प्रकरण न्यायालयात आहे याचा निर्णय न्यायालय देईल. न्यायालयाच्या निर्णयानंतर कॉंग्रेस पार्टी अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांचे मंदीर बांधेल असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अशोक गेहलोत यांनी घेतली राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

News Desk

… मग कर्ज कशासाठी !

News Desk

युतीच्या सत्तास्थापनेबाबतचा निर्णय भाजपने लिखित स्वरूपात द्यावा !

News Desk