HW News Marathi
राजकारण

काँग्रेसला फक्त माझ्या हत्येची स्वप्ने पडतात !

नवी दिल्ली | “काँग्रेस कायमच माझा तिरस्कार करत आली आहे कि त्यांना फक्त माझ्या हत्येची स्वप्ने पडत आहेत”, असा गंभीर आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. मात्र, देशातील जनता खंबीरपणे माझ्यामागे उभी आहे, हे ते विसरले आहेत”, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. ते प्रचारसभेत बोलत होते. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. देशात सध्या निवडणुकांचा काळ सुरु असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय पक्षांकडून एकमेकांवर होणाऱ्या वैयक्तिक टीकेमुळे देशातील राजकारणाची पातळी खालावत आहे.

‘‘काँग्रेसला माझा इतका तिरस्कार वाटतो कि त्यांना मला मारण्याची स्वप्ने पडत आहेत. मात्र, काँग्रेसला हे स्‍पष्‍ट करावे लागेल की ते नक्की भारताकडून आहेत कि पाकिस्तानकडून ? काँग्रेस सध्या अशा लोकांसोबत आहेत जे जम्‍मू आणि काश्मीरसाठी स्‍वतंत्र पंतप्रधानाची मागणी करत आहेत”, असे देखील मोदी यावेळी म्हणाले. “पंतप्रधान पदाची स्वप्ने पाहणाऱ्या विरोधी पक्षातील कोणाचीही विरोधी पक्षनेता बनण्याची देखील क्षमता नव्हती”, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नांदेडमध्ये होणार राज ठाकरेंची पहिली सभा ?

News Desk

मला नाव कमाविण्यापेक्षा सर्वसामान्यांचे आशीर्वाद कमवायचे आहेत !

News Desk

रामदास कदम उद्धव ठाकरेंचा कुत्रा, नितेश राणेंची जहरी टीका

News Desk