HW News Marathi
राजकारण

दिल्लीत काँग्रेस आपसाठी ४ जागा सोडण्यास तयार, मात्र केजरीवालांनी भूमिका बदलली !

नवी दिल्ली | “दिल्लीत आप आणि काँग्रेसने आघाडी केल्यास भाजपचा पराभव होऊ शकतो. आपसाठी काँग्रेस ४ जागा सोडण्यास तयार आहे. पण अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा आपली भूमिका बदलत यु-टर्न घेतला. आजही आमचे दरवाजे उघडे आहेत. परंतु, वेळ निघून जात आहे”, अशा आशयाचे ट्विट सोमवारी (१५ एप्रिल) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. आपल्या ट्विटमधून राहुल गांधी यांनी ‘आप’ला सूचक इशारा दिल्याचे बोलले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत आप आणि काँग्रेसच्या आघाडीची चर्चा सुरु होती. मात्र, जागांची समीकरणे जुळून येत नसल्याने ही युती टांगणीवर पडत असल्याचे म्हटले जात आहे.

“कसला यु टर्न ? आघाडी करणे ही तुमची इच्छा नाही तर दिखावा आहे, असे तुमच्या ट्विटवरून लक्षात येते. मला दुःख आहे कि, तुम्ही फक्त वक्तव्ये करत आहात. आज देशाला मोदी-शाह यांच्या संकटापासून वाचविण्याची गरज आहे. मात्र, दुर्भाग्य हे आहे कि उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यात विरोधी पक्षांचे मतविभाजन करून तुम्ही मोदींना मदत करत आहात”, असे प्रत्युत्तर अरविंद केजरीवाल यांनी दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर शरद यादव यांनी वसुंधरा राजेंची माफी मागितली

News Desk

शिवाजी महाराजांबाबत अपशब्द वापरणारा छिंदम तडीपार असूनही विजयी

News Desk

आम्ही आधी मुलांना घेतले अन् वडील आपोआप आले !

News Desk