HW News Marathi
राजकारण

काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाचा अनोख्या पद्धतीने निषेध

नवी दिल्ली | वाराणसी येथे आज कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाविरोधात अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला आहे.काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार अजय राय यांच्या नेतृत्त्वाखाली वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, अर्थमंत्री अरुण जेटली आणि आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचे फोटो ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटाच्या सिनेमाच्या पोस्टरमध्ये दाखवले आहेत.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वत्र मोदींच्या नोटबंदीच्या या निर्णयाला मोठ्या प्रमाणावर निषेध होताना दिसत आहे. एकीकडे भाजपकडून नोटबंदीचे फायदे शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षांकडून नोटबंदीचा निर्णय कसा फसला आहे हे दाखविण्याचा प्रयत्न सुरु आहे. याचसाठी काँग्रेसकडून आज हे आंदोलन करून या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मंत्री आणि संसदीय कामकाज मंत्री सभागृहात उपस्थित रहात नसल्याने अजित पवारांनी सरकारला खडसावले

Aprna

“राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरपला”, अजित पवारांनी वाहिली श्रद्धांजली

Aprna

“…ट्रेनमध्ये, रेल्वे पुलावर, गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होत असतील,” ऋता आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया

Aprna
देश / विदेश

सीबीआयचे नाट्य घडवले जात आहे !

swarit

मुंबई। ‘राफेल प्रकरणात मोदी सरकारच्या अडचणी वाढल्यामुळेच सीबीआयचे नाट्य घडवले जात आहे’,असा गंभीर आरोप ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी केला आहे. सीबीआयमधील दोन शीर्षस्थ अधिकाऱ्यांना सरकारने आज सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. यामध्ये सीबीआयचे दोन अधिकारी आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांचा समावेश आहे. यांपैकी वर्मा यांना चुकीच्या पद्धतीनं पदावरुन हटवल्याचा आरोप प्रशांत भूषण यांनी केला आहे. राकेश अस्थाना या वादग्रस्त अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरु आहे. याविरोधात भूषण सर्वोच्च न्यायलायत जाणार असे यांनी सांगितलं.राफेल डीलमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी सीबीआयकडे करण्यात आली होती. ती चौकशी पूर्ण होऊ नये, यासाठी सीबीआयमध्ये हालचाली घडवल्या जात आहेत. असा आरोप भूषण यांनी केला आहे.

काय आहे नेमकं CBI प्रकरण

राकेश अस्थाना यांना सीबीआयचे विशेष संचालक म्हणून पदोन्नती देण्यास आलोक वर्मा यांनी विरोध केला आणि इथेच सीबीआयमध्ये शीतयुद्ध सुरू झाले होते. सीबीआय अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करताना अस्थाना यांनी आपल्या शिफारशी धुडकावल्याचं वर्मांना जाणवलं आणि तणाव वाढला. १५ ऑक्टोबरला सीबीआयने अस्थाना यांच्याविरोधात लाच घेतल्याचा गुन्हा नोंदवला. त्यानंतर या प्रकरणाची दखल पंतप्रधान मोदींनी ही घेतलीय. हा वाद शमवण्याचं काम ते आपल्या हुकमी एक्क्याकडे – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडे सोपवण्याची शक्यता आहे.

Related posts

पुन्हा एक लढाऊ मिग विमान कोसळले

News Desk

आसारामला जन्मठेप | अन्य दोघांना 20-20 वर्षे शिक्षा

News Desk

नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाच्या प्रयत्नांवर पाणी फेरले

News Desk