HW News Marathi
राजकारण

“…ट्रेनमध्ये, रेल्वे पुलावर, गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होत असतील,” ऋता आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | “अंगावर धडकणाऱ्या व्यक्तिला बाजूला करणे गुन्हा असेल तर बाजारात, ट्रेन मध्ये, रेल्वे पुलावर, गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होत असतील,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची पत्नी ऋता आव्हाड (Ruta Awhad) यांनी ट्वीट करत केली आहे. आव्हाडांवर कळवा खाडी पुलाचे रविवारी (13 नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यात आव्हाड ही उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्यादरम्यान एका महिलेने आव्हाडांनी चुकाच स्पर्श झाल्याचा आरोप करत त्यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात ३५४ कलमांतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर आव्हाडांची पत्नी ऋता आव्हाड तीन  ट्वीट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ऋता आव्हाड ट्वीट करत म्हणाल्या, “ज्या महिलेने ही तक्रार दाखल केली आहे, त्यांच्याकडे मोटीव्ह आहे. छट पुजेवरून झालेल्या बाचाबाचीत रीदा रशिद यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्या जामिनावर आहेत. NCP व आव्हाडांविरोधात आक्षेपार्ह बोलल्या आहेत.” दुसऱ्या ट्वीटमध्ये ऋता आव्हाड म्हणाल्या, “अंगावर धडकणाऱ्या व्यक्तिला बाजूला करणे गुन्हा असेल तर बाजारात, ट्रेन मध्ये, रेल्वे पुलावर, गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होत असतील.” “रीदा रशिद ह्या राजकारणी महत्वाकांक्षा बाळगतात.आणि काल रात्री त्या कुणाला तरी भेटल्या. त्यांच्यावर पण अॅट्रोसिटी चा गुन्हा दाखल झाला आहे. जे काही घडलं ती spontaneous reaction होती. त्याला विनयभंग म्हणतां येत नाही”, असे तिसरे ट्विटमध्ये त्यांनी म्हटले.

 

नेमके काय आहे प्रकरण
कळवा खाडी पुलाचे रविवारी (13 नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी, खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थितीत होते. या कार्यक्रमादरम्यान आव्हाडांनी एका महिलेला चुकीचा स्पर्श केल्याचा दावा केला आहे. यानंतर ती 40 वर्षीय तक्रारदार महिलेने स्थानिक पोलिसात धाव घेतली. यानंतर महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली. या महिलेने केलेल्या तक्रारीवर आव्हाडांवर ३५४ कलमांतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. “मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे”, अशी घोषणा जितेंद्र आव्हाड  यांनी ट्वीट करत

 

संबंधित बातम्या

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राम मंदिर अयोध्येत नाही तर काय मक्का मदिनेत होणार ?

News Desk

Shivsena Dasara Melava 2018 | २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार !

News Desk

ठाकरे कुटुंबियांकडून रोशनी शिंदेंची भेट; तब्येतीची केली विचारपूस

Aprna