HW News Marathi
राजकारण

काँग्रेसची नीतिमत्ता स्वच्छ नव्हती म्हणूनच…!

नवी दिल्ली | “काँग्रेसची नीतिमत्ता स्वच्छ नव्हती. म्हणूनच त्यांनी मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले नाही. मात्र, मोदी सरकारच्या प्रयत्नाने मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले”, अशी बोचरी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. “काँग्रेसला देशद्रोहाचा कायदा हटवायचा आहे. काँग्रेसला तुकडे-तुकडे गँग, आपल्या देशाला शिव्या देणारे, तिरंग्याचा अपमान करणारे, नक्षलवाद्यांना समर्थन देणारे लोक हवे आहेत”, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला आहे.

पंतप्रधान मोदी हे हरियाणा येथे झालेल्या प्रचारसभेत बोलत होते. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे कि जर काँग्रेस केंद्रात सत्तेत आले तर ते देशद्रोहाचा कायदा रद्द करतील. त्याचप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला विशेष अधिकार देणारा आफ्स्पा (AFSPA) कायदा देखील काढून टाकणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. असे करून दगडफेक करणाऱ्यांना, नक्षलवाद्यांना, दहशतवाद्यांना खुली सूट देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कॉंग्रेसने कधीही भगवा दहशतवाद असे म्हटले नाही | पीएल पुनिया

News Desk

रुपयाचे मुल्य घसरले, उद्धव ठाकरेंचे सरकारवर टिकास्त्र

News Desk

ठाकरे गटाच्या ‘या’ आमदाराला एसीबीने पाठविली नोटीस

Aprna