HW News Marathi
राजकारण

पंकजा मुंडे घेणार सावरगावात दसरा मेळावा

बीड । पकंजा मुंडे आवाज भगवानबाबा यांच्या जन्मगावी बीडमधील सावरगावात दसरा मेळावा घेण्यात येणार आहार. गोपीनाथ मुंडे हयात असताना भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यात यायचा. परंतु काही राजकीय कारणांमुळे हा दसरा मेळावा घेण्यात अडचणी निर्माण होत होत्या.दसऱ्या मेळाव्यासारख्या चांगल्या सोहळ्यावरून वाद नको म्हणून ,पंकजा मुंडे यांनी सावरगावात दसरा मेळावा घेण्याचे ठरवले आहे.

“संघर्षाच्या वाटचालीमध्ये सीमोल्लंघनाचा उत्सव आपल्याला ऊर्जा आणि प्रेरणा दिल्याशिवाय राहणार नाही. की मी येत आहे.”.असे ही पंकजा मुंडे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून आवाहन केले आहे.

आगामी निवडकांमुळे हा दसरा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे. या मेळाव्यातच निवडणुकासाठीच्या दिशा, धोरण ठरवली जातील. पंकजा मुंडे नेमकं मेळाव्यात काय बोलतील याची औत्सुकता सगळ्यांना आहे. तसेच आज भगवानबाबांच्या स्मारकाचे अनावरणही करण्यात येणार आहे.त्यासाठी भाजप खासदार प्रीतम मुंडे रॅली घेऊन निघणार आहे. गेल्या वर्षीसुद्धा सावरगावात मोठ्या जल्लोषात दसरा मेळावा पार पडला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

धुळ्याचे भाजप आमदार अनिल गोटेंनी स्थापन केला नवा पक्ष

News Desk

देशभरात पाचव्या टप्प्यात ६३.५० टक्के मतदान

News Desk

आता या स्थानकाचे ही नाव बदलणार

News Desk
देश / विदेश

भारत अहिंसेच्या मार्गाने चालणारा देश, भागवतांनी केले गांधीजींच्या कार्याचे कौतुक

News Desk

नागपूर | दस-याचे औचित्यसाधून स्वसंसेवकसंघाच्या व्यासपीठावरुन सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून महात्मा गांधीजींच्या कार्याचे प्रचंड कौतुक केले.सत्य आणि अहिंसेच्या जोरावर राजकारण केले जाऊ शकते, याची कल्पना फक्त आपल्याच देशातील व्यक्ती करू शकते. महात्मा गांधी यांनी ते करुन दाखवले आहे, अशा शब्दांमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी महात्मा गांधी यांचं कौतुक केले आहे.

इंग्रजांचा सामना महात्मा गांधीजींनी निशस्त्रपणे केला. केवळ नैतिक बळाच्या आधारावर त्यांनी इंग्रजांशी दोन हात केले, असेही भागवत यावेळी बोलताना म्हणाले. संघ मुख्यालयात आज विजयादशमी उत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना सरसंघचालकांनी महात्मा गांधींच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. या कार्यक्रमाला नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी प्रमुख पाहुणे उपस्थित राहिले आहेत.

 

Related posts

ऑडी डिव्हिजनचे सीईओ रुपर्ट स्टँडलर यांना अटक

News Desk

फ्लोरिडामध्ये ‘बोईंग ७३७’ विमान नदीत कोसळून अपघात

News Desk

२०१९च्या निवडणुकीसाठी भाजपचा नवा फॉर्म्युला

News Desk