HW News Marathi
राजकारण

नवी मुंबई, ठाण्यासह पुणे शहराच्या नामकरणाची मागणी

मुंबई | शहरांच्या नावाच्या नामांतराचा मुद्दा देशभर गाजत आहे. नावे बदलण्याची हवा उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात पोहोचली आहे. महाराष्ट्रात औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामकरणाच्या मागणीनंतर विद्येचं माहेरघर पुणे शहराचं नाव बदलण्याची मागणी झाली. विविध पक्ष, संघटनांनी शहरांची नावं बदलण्याची मागणी केली. त्यानंतर आज (२८ नोव्हेंबर) विधानसभेमध्ये समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी नवी मुंबई, ठाणे आणि पुणे शहरांच्या नामकरणाची मागणी केली.

विधानसभेत बोलण्यासाठी आझमी उभे राहिले तेव्हा त्यांनी आपल्या मागणीची सुरुवात करण्याआधीच ‘शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणा दिली. पुढे बोलताना त्यांनी नवी मुंबईला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी सरकारकडे केली. केवळ इतक्यावरच न थांबता आझमी यांनी ठाणे आणि पुण्याचे नाव बदलून शिवाजी महाराजांची आई राजमाता जिजाबाई आणि पुत्र संभाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी केली. आपल्या या मागण्यांना संपूर्ण विधानभवन समर्थन देईल अशी आशा असल्याचेही सांगत त्यांनी आपली मागणी विधानभवनात मांडली.

या आधी औरंगाबादचं नाव संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव धाराशीव करण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली होती. तर औरंगाबाद जिल्ह्याचे नाव संभाजीनगर, उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशीव आणि पुणे शहराचे ‘जिजापूर’ करावं, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने राज्य सरकारला पत्र लिहून केली होती.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

संविधानाला कोणताही धोका नाही- आठवले

News Desk

मूळ शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदेंना भेटणार! – किशोरी पेडणेकर

Aprna

मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे !

News Desk
राजकारण

मुख्यमंत्री पर्रीकर करणार लवकरच कामकाजाला सुरुवात !

Gauri Tilekar

पणजी | गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अमेरिकेहून जरी राज्यात परतले आहेत. परंतु अजूनही ते मंत्रालयात उपस्थित झालेले नाहीत. ते सध्या ते पूर्ण विश्रांती घेत असून सोमवारीपासून पुन्हा कामकाजाला सुरुवात करतील,अशी माहिती मिळत आहे.

“मनोहर पर्रीकर सोमवारी मंत्रालयात येतील,” असे याआधीही मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले होते. मात्र, ते सोमवारी व मंगळवारीसुद्धा कार्यालयात आले नाहीत. गेले अनेक दिवस मुख्यमंत्री मंत्रालयात येऊ शकले नसून मंत्रिमंडळाची बैठकही गेल्या अनेक आठवडे घेण्यात आलेली नाही. काही प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी बाय सर्क्युलेशन पद्धतीने मंत्र्यांकडे फिरत होते, ते मंजूर झाले आहेत.

मंत्रिमंडळातील एकूण तीन सदस्य आजारी असून ते मंत्रालयात येऊ शकत नाहीत. त्यामुळे आता खातेबदलासाठी भाजपच्या एका मोठ्या गटाकडून मागणी होत आहे. मात्र पर्रीकर यांनी अजून तरी आजारी मंत्र्यांच्या खातेबदलाबाबत फारसा उत्साह दाखवलेला नाही.

काहीच दिवसांपूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे जेव्हा तिसऱ्यांदा अमेरिकेत उपचारासाठी गेले होते तेव्हा ‘पर्रीकरांनी आरोग्याच्या कारणामुळे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे आणि आता दुसरा मुख्यमंत्री नेमला जावा’, अशी मागणी काँग्रेसकडून केली गेली होती. पर्रीकरांच्या सतत खालावणाऱ्या प्रकृतीमुळे भाजपने आता पूर्णवेळ तंदुरुस्त मुख्यमंत्री नेमावा, अशी मागणी काँग्रेसकडून केली गेली होती.

Related posts

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार

Aprna

अनिल देशमुखांनी भाजपवर केलेल्या ‘त्या’ आरोपाचे गिरीश महाजनांनी केले खंडन

Aprna

शरद पवारांनी बोलावली बैठक

News Desk