HW News Marathi
राजकारण

दिग्विजय यांचे मोदींना आव्हान, हिंमत असेल तर माझ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

नवी दिल्ली | पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवाना शहीद झाले होते. या पुलवामा हल्ल्याला मंगळवारी ( ५ मार्च) काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ‘दुर्घटना’ असे ट्विट केले होते. या ट्विटनंतर दिग्विजय यांच्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली होती. या पार्श्वभूमीवर दिग्विजय यांनी आज (६ मार्च) पुन्हा एकदा ट्विट करत म्हटले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला आव्हान केले आहे. हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा.”

दिग्विजय यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले होते की, या वादग्रस्त विधानानंतर सर्व स्तरातून दिग्विजय यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. या ट्विटमध्ये दिग्विजय यांनी म्हटले आहे. “पुलवामा दुर्घटनानंतर भारतीय वायुसेनेने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर काही विदेशी मीडियांनी यावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. यामुळे भारताच्या विश्वसनीयतावर सवाल उपस्थित होत आहेत.”

दिग्विजय यांनी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते केशव प्रसाद मौर्य यांच्याबद्दलचा एक व्हिडीओ रिट्विट केला आहे. मौर्य यांनी पत्रकार परिषदेत बोलताना पुलवामा येथे झालेला भ्याड हल्ल्याचा उल्लेख दुर्घटना असा केला असल्याचा दिग्विजय यांनी केला आहे. यावर दिग्विजय यांनी मोदी सरकार आता यांना देखील देशद्रोही म्हणणार का असा सवाल उपस्थित केला आहे.

उत्तर प्रदेशचे केशव प्रसाद मौर्य यांचा पत्रकार परिषदेचा व्हिडिओ रिट्विट केला आहे. मौर्य यांनी पत्रकार परिषदेत बोलताना पुलवामा येथे झालेला भ्याड हल्ल्याचा उल्लेख ‘दुर्घटना’ असा केला असल्याचा दावा सिंह यांनी केला आहे. यावर सिंह यांनी मोदी सरकार आता यांनादेखील देशद्रोही म्हणणार का असा सवाल केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नरभक्षक वााघाची शिकार करावी लागते, आयुक्तांना आनंद परांजपे यांचा टोला 

News Desk

काँग्रेस छत्तीसगढमधील नक्षली कारवायांचे समर्थन करते | मोदी

News Desk

मोदी सरकारच्या नोटाबंदी-जीएसटीमुळे देशात आर्थिक मंदी !

News Desk