HW News Marathi
राजकारण

शहा-फडणवीस भेटीत मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा ?

मुंबई | भाजप अध्यक्ष अमित शहांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ताबडतोब दिल्लीला बोलावले आहे. त्यामुळे आज संध्याकाळी फडणवीस दिल्लीला रवाना होणार आहेत. या बैठकीत मंत्रिमंडळ फेरबदलाबद्दल चर्चा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळातील फेरबदलाचा विषय गेल्या काही दिवसांपासूरन रेंगाळला आहे. यासाठी भाजप अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावले आहे.

दसऱ्यानंतर मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या हालचालींना वेग आला आहे. यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत अमित शहांची भेट घेणार आहेत. याशिवाय शिवसेनेला खूष करण्यासाठी दोन ते तीन मंत्रीपदे दिली जाऊ शकतात, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. भाजपच्या कोट्यातील पाच जागा अजून भरायच्या आहेत आणि पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे कृषिमंत्रीपदही रिक्त आहे. तर, शिवसेना नेते दीपक सावंत यांनी जून महिन्यात आरोग्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याने एक जागा शिवसेनेसाठी आहे. परंतु, त्यांना अधिकच्या दोन जागा देऊन भाजपा ‘मातोश्री’ची नाराजी दूर करेल, असा अंदाज आहे.

पितृपक्ष संपल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. परंतु, आता या विस्तारासाठी दसऱ्यानंतरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे कुणाची दिवाळी ‘शुभ’ होणार आणि कुणाचा ‘फटाका फुटणार’, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खासगी कंपनीद्वारे एक सर्वेक्षण करून घेतले. आपले मंत्री, आमदार, खासदार किती पाण्यात आहेत, याची चाचपणी त्यांनी केली आहे. या सर्वेक्षणाच्या आधारेच ते आपली नवी टीम निवडतील. स्वाभाविकच, ‘मिशन लोकसभा’ आणि नंतरच्या विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्यासाठी जात, प्रदेश, भाषा या गोष्टी विचारात घेऊन मंत्र्यांची निवड केली जाईल, याकडे जाणकारांनी लक्ष वेधले.

शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. नरेंद्र-देवेंद्र सरकारवर रोज टीकास्त्र सोडले जात असले, तरी भाजपाकडून ‘लोकसभा-विधानसभा पॅकेज डील’ दिले गेल्यास ते युतीसाठी तयार होऊ शकतात. विरोधक एकत्र मैदानात उतरण्याची चिन्हे असल्याने भाजपालाही आपल्या या जुन्या मित्राची गरज भासणारच आहे. त्यांना अगदी वरिष्ठ पातळीपासून फोनाफोनी झाल्याचे अलीकडच्या काळात पाहायला मिळाले होते. आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्ताने भाजप ‘मास्टरस्ट्रोक’ लगावण्यासाठी सज्ज आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आयुष्यमान भारत’ योजना म्हणजे मोदी सरकारचा अजून एक ‘जुमला’ – सचिन सावंत

News Desk

…तरचं हार्दिक पटेल पिणार पाणी 

News Desk

पंतप्रधान मोदी एखाद्या सडकछाप माणसाप्रमाणे बोलतात, मेमन यांची जीभ घसरली

News Desk