HW News Marathi
राजकारण

निवडणुकी आधी बंद दाराआड युतीची चर्चा

मुंबई | आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होणार का? यावर सेना नेहमीच स्वबळाचा नारा देत आली आहे. परंतु गोदावरी अर्बन बँकेच्या उद्घाटनानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.एका वृत्त वाहिनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (१९ नोव्हेंबर) गोदावरी अर्बन बँकेच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर या दोघांमध्ये चर्चा झाली आहे.

शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांच्या गोदावरी अर्बन बँकेच्या नरिमन पॉईंट येथील शाखेचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी त्याच इमारतीमधील एका हॉटेलमध्ये १५ ते २० मिनिटे चर्चा केली. पण दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.सोमवारी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनादरम्यान दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शरद पवारांनी घेतली राणेंची भेट, राजकीय चर्चेला उधाण

News Desk

“शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना कधी दिल्लीत यावे लागले नाही,” संजय राऊतांचा टोला

Aprna

…आम्ही असल्या धमक्यांना भीक घालत नाही! – एकनाथ शिंदे

Aprna
देश / विदेश

जाती धर्म भेद विसरून छत्रपती शिवरायांचे मावळे व्हा | रामदास आठवले

News Desk

पारतंत्र्याविरुद्ध स्वकीय भूमिपुत्रांना एकत्र करून अतुलनीय शौर्याच्या बळावर स्वराज्याची संस्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव साजरा करताना त्यांच्या सैन्यात सर्व जातीधर्माचे मावळे एकतेने नांदत होते. तसेच आपसातील सर्व जातीधर्माचे भेदभाव विसरून दलित मराठ्यांसह बहुजनांनी शिवरायांचे मावळे होण्याचा संकल्प करा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिकन्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

आज शिवजन्मोत्सव सोहळा देशभरात मोठ्या दिमाखात साजरा होत असून दिल्लीतही मोठ्या उत्साहात साजरा झाला. नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील भव्य दिव्य पुतळ्याला केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अभिवादन केले.याप्रसंगी पारम्पारिक वेशभूषेत वस्त्र परिधान करुन महाराष्ट्रतील मराठी समुदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.विशेष करुन अभिवादन रॅलीमध्ये केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले आणि राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीमहाराज यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणून एकात्मता व सौहार्दतेचा संदेश देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा करून आदर्श राजा’शिवरायांची शिवशाही आजही सर्व भारतीयांना हवी आहे. शिवाजी महाराजांना सारखे शूर आणि महान व्यक्तीमत्व महाराष्ट्र भूमीत जन्मले याचा आम्हाला अभिमान आहे.राष्ट्रनिर्माणाची मुहूर्तमेढ शिवाजी महाराजांनी जवळपास साडेतीनशे वर्षांपूर्वीच रोवली होती. शिवाजी महाराजां आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत राहिले आहेत अश्या शब्दांत छत्रपती शिवरायांचा गौरव ना रामदास आठवलेंनी आपल्या भाषणात यावेळी केला

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी विष्णूचा ११ वा अवतार !

News Desk

बजरंग दल, विहिंप भारतातील धार्मिक दहशवादी संघटना

News Desk

… तर फटाक्यांची माळच लागेल !, मुख्यमंत्र्यांना टार्गेट करत राज ठाकरेंचा इशारा

News Desk