HW News Marathi
राजकारण

आम्हाला चर्चा नको…आधी मदत जाहीर करा ! 

मुंबई । राज्यातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या हाताला काम नाही…हातचं पीक गेलं…शेतकऱ्यांनी जगायचं कसं असा सवाल करतानाच शेतकरी आपले सरण रचून आत्महत्या करत आहेत. धनगरांनाही आरक्षण मिळत नाही…आम्हाला सभागृहात चर्चा नकोय…आधी मदत जाहीर करावी आणि मराठा आरक्षण पटलावर आणावे अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली मात्र हा स्थगन प्रस्ताव सभापतींनी फेटाळला त्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण होवून सभागृहाचे कामकाज अर्धा तासासाठी तहकुब करण्यात आले.

धनंजय मुंडे यांनी १९७२ पेक्षा भयानक असा राज्यात दुष्काळ पडल्याचे सांगतानाच सरकारने दुष्काळ जाहीर करुन २२ दिवस उलटले तरी शेतकऱ्यांना मदत किंवा टॅंकर दिले जात नाहीय. दुष्काळाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अशावेळी हा नियम २८९ चा मुद्दा होत नाही का असा सवाल करतानाच १९७२ च्या दुष्काळाऐवजी २०१८-१९ मधील या भयंकर दुष्काळाची इतिहासामध्ये नोंद होणार असल्याचे स्पष्ट केले.

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना १ लाख हेक्टरी जाहीर करा आणि दुष्काळी भागातील विदयार्थ्यांची फी माफ करावी अशी मागणी यावेळी केली. दुष्काळ आणि आरक्षणाचा प्रश्न मांडत असताना सभापतींनी हा स्थगन प्रस्ताव फेटाळला. त्यामुळे सभागृहामध्ये गोंधळ निर्माण झाल्याने सभागृहाचे कामकाज तहकुब करण्यात आले. त्यानंतरही सभागृहाचे कामकाज सुरु झाले मात्र पुन्हा सभागृहामध्ये गोंधळ निर्माण झाल्याने पुन्हा एकदा अर्धा तासासाठी कामकाज तहकुब करण्यात आले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ‘या’ काही ठरल्या लक्षवेधी

News Desk

व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे अडचणीत आल्या किरण खेर आयोगाने पाठविले नोटीस

News Desk

शिवस्मारकाचा छळ करणाऱ्यांनाही पटकून टाका !

News Desk
राजकारण

मराठा आरक्षण कोर्टात टिकू दे म्हणता म्हणजे शंकेची पाल चुकचुकतेच !

News Desk

मुंबई । कार्तिक एकादशीला काहीजण पाऊस पडू दे म्हणतात. परंतु सभागृहनेते चंद्रकात पाटील यांनी मराठा आरक्षण कोर्टात टिकू दे असे साकडे घातले. यावरूनच शंकेची मनात पाल चुकचुकू लागली आहे. त्यामुळे आमची मागणी आहे जो अहवाल असेल तो पटलावर ठेवावा. जर ठेवला नाही तर सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही असा इशारा विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारला दिला आहे.

आमची सर्व विरोधी पक्षाची भूमिका हिच आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मागास आयोगाने ज्या शिफारसी दिल्या आहेत. त्या मुख्यमंत्र्यानी स्पष्टपणे वाचून दाखवल्या नाहीत. मागास आयोगाच्या शिफारसी वाचून दाखवण्यापेक्षा संपूर्ण अहवाल दाखवावा अशी मागणी अजितदादा पवार यांनी केली. २९३ चा प्रस्ताव हा सरकारचा अभिनंदन करणारा आहे. परंतु आमचा त्याला विरोध आहे. फिल्डवर ज्या अडचणी लोकांना येतात ते वास्तव आम्हाला सभागृहामध्ये मांडायचे आहे. सरकारने दुष्काळ जाहीर केला परंतु त्यामध्ये अनेक तालुक्यांचा समावेशच करण्यात आलेला नाही. यासर्व गोष्टी आम्हाला सरकारच्या लक्षात आणून द्यावयाच्या आहेत. आज सकाळपासून आम्हाला सभागृहामध्ये ही चर्चा करायची होती परंतु मुख्यमंत्री सभागृहात आलेले नाहीत. हे आमच्या डोक्यावर यांचे खापर फोडतील म्हणून आम्हाला काही गोष्टी समजल्या पाहिजेत. त्यामुळेच मी सभागृहात वक्तव्य केल्याचा खुलासा अजितदादा पवार यांनी केला.

मागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे…

सभागृहामध्ये नुसती वांजोळी चर्चा करून काही फायदा नाही. मागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे. आम्ही म्हणतोय टीसचा अहवाल पटलावर ठेवा. त्यामुळे त्यात काय आहे ते तरी कळेल. धनगड आहे की धनगर आहे हे तो अहवाल समोर आल्यावर कळणार आहे असेही अजितदादा पवार म्हणाले.

Related posts

युतीचा निर्णय जाहीर होण्यापूर्वी भाजप-शिवसेनेच्या स्वतंत्र बैठका सुरु

News Desk

मूळ शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदेंना भेटणार! – किशोरी पेडणेकर

Aprna

छत्तीसगडमध्ये नवे पर्व

News Desk