HW News Marathi
राजकारण

“दुश्मन का दुश्मन दोस्त होता है”; अनिल परबांचे बच्चू कडू यांच्यासंदर्भात सूचक विधान

मुंबई | “दुश्मन का दुश्मन दोस्त होता है”, असे सूचक विधान करत ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना टोला लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जेव्हा बंड पुकारला. यानंतर शिंदेच्या बंडानंतर त्यांनी भाजपशी हात मिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केले. तर मुख्यमंत्र्यांसोबत पहिल्यापासून प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) हे त्यांच्यासोबत आहेत. यानंतर राज्यात शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार पार पडला. राज्यातील दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात बच्चू कडू यांना स्थान मिळणार का?, यावरून राज्याचे राजकारण तापले आहे.

अनिल परब म्हणाले, “बच्चू कडू यांनी लढाई जोरात लढावी, यासाठी माझ्याकडून बच्चू कडू यांना शुभेच्छा. ही बच्चू कडू यांच्या स्वाभिमानाची लढाई आहे. ते जर म्हणत असतील की, त्यांना ५० खोके मिळाले नाहीत. तर किती मिळालेत आणि किती राहिलेत याचा देखील त्यांनी हिशोब द्यावा. आम्ही कुणाला संपर्क केलेला नाही आणि आमच्या संपर्कात देखील कुणीही नाही. कदाचित न्यायालयात साक्ष तपासतील. तेव्हा याबाबत सर्व तपशील बाहेर येईल, दुश्मन का दुश्मन दोस्त होता है” अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांना डावलले

राज्यात शिंदेंनी शिवसेनेसोबत बंडखोरी करत भाजपसोबत हात मिळवणी केली. यानंतर राज्यात शिंदेंनी सरकार स्थापन केले. यानंतर भाजप आणि शिंदे गटाचे 16 म्हणजे 8-8 तर यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळूण 18 मंत्रिमंडळाचे विस्तार करण्यात आला. यात शिंदे गटासोबत पहिल्यापासून अपक्ष आमदार असलेले बच्चू कडू यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यावेळी बच्चू कडू यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. यानंतर आता राज्यात दुसऱ्यांदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा राज्यात रंगू लागल्या आहेत. यानंतर बच्चू कडू यांना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सूचक विधान केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१०० दिवसांत मोदी सरकारपासून देशातील जनता मुक्त होईल !

News Desk

मार्गारेट अल्वा UPA कडून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार; शरद पवारांनी केली घोषणा

Aprna

कॉंग्रेसने लोकशाहीची हत्या केली | नरेंद्र मोदी  

News Desk