HW News Marathi
राजकारण

#Elections2019 : जाणून घ्या…कल्याण मतदारसंघाबाबत

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांमधील 48 मतदारसंघाबद्दल आपण जाणून घेत आहोत. लोकसभेमध्ये आपला प्रतिनिधी पाठवण्यासाठी आपण सर्वच मतदान करत असतो. मात्र ज्या नेत्याला पक्षाला आपण मत देतो त्याची माहीती करुन घेणही महत्वाच असतं, महाराष्ट्रातील मतदानाचे 3 टप्पे पार पडले आहे तर चौथा आणि शेवटचा टप्पा २९ एप्रिल ला असणार आहे. आणि २३ मे ला निवडणुकांचे निकाल लागतील. तर आज आपण पाहणार आहोत चौथ्या टप्यातील कल्याण मतदार संघाबाबत. कल्याण लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात यामध्ये अंबरनाथ,उल्हासनगर,कल्याण पुर्व,डोंबिवली,कल्याण ग्रामीण,आणि मुंब्रा-कळवा या मतदार संघाचा समावेश होतो.

उमेदवार कोण ?

कल्याण मतदार संघातून यावेळी शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील लोकसभेच्या मैदानात आहे. बहुजन समाज पक्षाचे रविंद्र केने त्याचबरोबर इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून एकुण २८ उमेदवार कल्याण मधून रिंगणात आहेत.

कल्याण मध्ये २०१४ ची स्थिती

कल्याणमध्ये २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादीकडून आंनंद परांजपे,आणि मनसेकडून प्रमोद पाटील हे लोकसभेच्या मैदानात होते. त्यापैकी शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांचा ४,४०,८९२ इतकी मतं मिळून विजय झाला होता. तर राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांना १,९०,१४३ इतकी मतं मिळाली होती. यांच्या मतांचा फरक पाहीला तर २,५०,७४९ इतक्या मतांनी शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांचा विजय झाला होता. तर मनसेच्या प्रमोद पाटील यांना १,२२,३४९ इतकी मतं मिळाली होती . यांच्या मतांची टक्केवारी पाहील्यास शिवसेनेला २२ टक्के, राष्ट्रावादी ला ९ टक्के, आणि मनसेला ६ टक्के मतं मिळाली होती.

कल्याण मतदारसंघातील मतदारांची संख्या

कल्याण मधील एकुण मतदार संख्या आहे 19,27,608 तर येथील महिला मतदारांची संख्या आहे 8,86,631 इतकी तर पुरुष मतदारांची 10,40,793 इतकी संख्या आहे.

शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी लढत

कल्याणमधील इतिहास पहता गेल्या २ टर्म पासून येथे शिवसेनेची सत्ता आहे. तर येथील विधानसभेची स्थिती पाहील्यास अंबरनाथ आणि कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेना, उल्हासनगर आणि मुंब्रा-कळवामध्ये राष्ट्रावादी, कल्याण पुर्व मध्ये अपक्ष, तर डोंबिवली मध्ये भाजपची सत्ता आहे. तसेच उत्तर भारतीय, सिंधी आणि मुस्लिम समुदाय कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. मराठा आणि सवर्ण समाजाचाही मोठा दबदबा येथे असल्याचे बोलले जाते. शिवसेनेच्या माध्यमातून याठिकाणी अनेक विकासात्मक कामे केले असल्याचे सांगण्यात येते. तर आता याठीकाणाहून एकमेकांसमोर उभे ठाकलेले शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांच्यापैकी शिवसेना आपली सत्ता राखते की निकाल काही वेगळे येतात हे पाहणं महत्वाच आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या तिसऱ्या उमेदवार यादीत महाराष्ट्रातील ६ उमेदवारांचा समावेश

News Desk

#LokSabhaElections2019 : विजयसिंह मोहिते-पाटील देखील मनाने भाजपमध्येच आहेत !

News Desk

कोणाची कॅालर तर कोणाच्या मिशा, हीच आहे का सातारच्या प्रचाराची दिशा ?

News Desk