HW News Marathi
राजकारण

देशात आणीबाणी सदृश्य स्थिती !

अहमदनगर । विरोधकांना नाउमेद करण्याची भूमिका सध्याचे सरकार घेत असून देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. असा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर प्रकरणात युपीएच्या प्रमुख सोनिया गांधींना गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मिशेलने सोनिया गांधीचे नाव घेणे हा सुध्दा कटाचाच भाग असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

नगर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. मंदिर, मशिदवर चर्चा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आधुनिकता व विज्ञान नविन पिढीत रुजवण्यावर चर्चा व्हावी असे मतही त्यांनी मांडले. देशाच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेउन आरोप केले. सीबीआयसारखी तपास संस्था सुध्दा यापासून दुर राहीली नाही. रघुराम राजन यांनी राजीनामा दिला. मोदींनी गुजरातमधून उर्जित पटेल यांना आणले पण त्यांच्यासोबतही त्यांचे जमले नाही. पटेल यांनाही राजीनामा द्यावा लागला. आताही त्यांनी आपलाच माणूस बसवला आहे. आपल्या संस्था डळमळीत होत आहे. यापुर्वी असे कधीच झाले नाही. असे म्हणत पवारांनी मोदींच्या कार्यपद्धतीवर हल्ला चढवला.

पाच राज्यांच्या निवडणुकींचे निकाल जाहीर झाल्यावर ८ दिवसातच मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये तेथील राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. मात्र देशाचे पंतप्रधान त्याला लॉलीपॉप संबोधतात हे चुकीचे आहे. त्या राज्यांना आर्थिक मदत देण्याऐवजी पंतप्रधानांनी असे वक्तव्य करणे योग्य नाही. केंद्र सरकारला शेतकऱ्यांबाबत सहानुभूती नाही अशी टीका सुद्धा पवारांनी केली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कावीळ झालेल्याला जग पिवळं दिसतं, तशीच राम कदमांची अवस्था !

News Desk

अमित शहा मुंबईत दाखल

News Desk

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप किंवा शिंदे गटापैकी कोण निवडणूक लढवणार?

Aprna
देश / विदेश

नववर्षात पेट्रोल-डिझेल स्वस्त

News Desk

मुंबई | पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने सर्व सामान्यांचे हाल होतात. परंतु यंदाच्या नववर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये मोठी कपात होणार असल्याचे संकेत मिळाले आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने पेट्रोलसह डिझेलच्या किंंमतीत घट होणार आहे. त्याशिवाय सरकारकडून मिथेनॉलयुक्त पेट्रोल विकण्याची परवानगी मिळताच पेट्रोल-डिझेल १० ते १५ रुपयांनी स्वस्त होणार असल्याचा अंदाज अर्थ तज्ञांनी व्यक्त केला आहे. कच्या तेलाच्या दरांत घट होवून जवळपास ७१ टक्क्यांची घसरण होणार आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइलच्या किंमतीत घसरण सुरू असून बुधवारी (२६ डिसेंबर) क्रूड ऑइल ५० डॉलर प्रति बॅरल दराने विकले जात होते. २ ऑक्टोबरमध्ये क्रूड ऑइल ८५.६ डॉलर प्रति बॅरलदराने विकले जात होते. तेव्हापासून आजपर्यंत कच्या तेलाच्या दरांत घट होवून जवळपास ७१ टक्क्यांची घसरण झाली आहे.

नीती आयोगाच्या देखरेखीखाली सरकार देशभरात १५ टक्के मिथेनॉल मिसळलेले पेट्रोल आणण्याची तयारी करत आहे. यासाठी पुण्यात चाचण्याही सुरू झाल्या आहेत. जर सरकारची योजना यशस्वी झाली तर पेट्रोल १० रुपयांनी स्वस्त होणार आहे. मिथेनॉल कोळशापासून तयार केले जाते. सध्या पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल मिसळले जाते. इथेनॉल ऊसापासून तयार केले जाते. इथेनॉलसाठी प्रती लीटर ४२ रुपये खर्च होतात. तर मिथेनॉलसाठी २० रुपये प्रती लीटर खर्च येतो. इथेनॉलच्या तुलनेत मिथेनॉल स्वस्त असल्यानेच या पर्यायाचा विचार केला जात आहे.

Related posts

…आणि महुआ मोईत्रा यांनी त्यांचा बुरखा फाडला, सामनातून केंद्रावर निशाणा

News Desk

CTET परीक्षेचा आज निकाल जाहीर होणार

Aprna

तिहेरी तलावर सहा महिन्यांची बंदी, केंद्र सरकारला कायदा करण्याचे आदेश

News Desk