HW News Marathi
राजकारण

देशात आणीबाणी सदृश्य स्थिती !

अहमदनगर । विरोधकांना नाउमेद करण्याची भूमिका सध्याचे सरकार घेत असून देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. असा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर प्रकरणात युपीएच्या प्रमुख सोनिया गांधींना गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मिशेलने सोनिया गांधीचे नाव घेणे हा सुध्दा कटाचाच भाग असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

नगर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. मंदिर, मशिदवर चर्चा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आधुनिकता व विज्ञान नविन पिढीत रुजवण्यावर चर्चा व्हावी असे मतही त्यांनी मांडले. देशाच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेउन आरोप केले. सीबीआयसारखी तपास संस्था सुध्दा यापासून दुर राहीली नाही. रघुराम राजन यांनी राजीनामा दिला. मोदींनी गुजरातमधून उर्जित पटेल यांना आणले पण त्यांच्यासोबतही त्यांचे जमले नाही. पटेल यांनाही राजीनामा द्यावा लागला. आताही त्यांनी आपलाच माणूस बसवला आहे. आपल्या संस्था डळमळीत होत आहे. यापुर्वी असे कधीच झाले नाही. असे म्हणत पवारांनी मोदींच्या कार्यपद्धतीवर हल्ला चढवला.

पाच राज्यांच्या निवडणुकींचे निकाल जाहीर झाल्यावर ८ दिवसातच मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये तेथील राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. मात्र देशाचे पंतप्रधान त्याला लॉलीपॉप संबोधतात हे चुकीचे आहे. त्या राज्यांना आर्थिक मदत देण्याऐवजी पंतप्रधानांनी असे वक्तव्य करणे योग्य नाही. केंद्र सरकारला शेतकऱ्यांबाबत सहानुभूती नाही अशी टीका सुद्धा पवारांनी केली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तोपर्यंत आम्ही कोस्टल रोडचे काम होऊ देणार नाही, मनसेचा इशारा

News Desk

काँग्रेसमध्ये पंतप्रधानपदाची जागा ही जन्मापासूनच आरक्षित !

News Desk

“रायगडमध्ये होणारा बल्क ड्रग पार्कचा प्रकल्पही महाराष्ट्रातून बाहेर”, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर आरोप

Aprna