HW News Marathi
राजकारण

राष्ट्रवादी करणार १८ नगरसेवकांवर कारवाई

अहमनदनगर । राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी पक्षांनी दिलेले आदेश धुडकावून भाजपला पाठिंबा दिला. अहमदनगरमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या १८ नगरसेवकांवर येत्या ४ ते ५ दिवसात कारवाई करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आदेश दिले आहे. पवार यांनी रविवारी(३० डिसेंबर) अहमदनगर येथील झालेल्या पत्रकार परीषदेदरम्यान बोलत होते.

नगर महापालिकेत कुठल्या कारणांमुळे भाजपला पाठिंबा दिला गेला. पक्षादेश का डावलला गेला. याची चौकशी आम्ही करणार आहोत. नगरच्या झालेल्या निवडणुकीसंदर्भात सर्व माहिती मागितली असून या प्रकरणाची गंभीर दखल पक्षाने घेतली आहे. पक्षाकडून येत्या ४ किंवा ५ जानेवारीला होणाऱ्या बैठकीत नगरसेवकांवर कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात शहर जिल्हाध्यक्षांकडे अहवाल मागितला असल्याचेही यावेळी पवारांनी सांगितले.

आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला या घटनेचा मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याने नगरसेवकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. महापौर निवडणुकांत स्थानिक नेत्यांनी पक्षादेश झुगारुन निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. जर पक्षाला विचारत न घेता भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्यास संबंधित नगरसेवकांवर कारवाई केली जाईल, असे पवार यांनी म्हटले आहे.

महापौर निवडणुकांवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिल्यानंतर सर्वच स्तरातून राष्ट्रवादीला लक्ष्य करण्यात आलं होत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही चकीत झाले आहेत. परंतु याबाबत मी माहिती घेतली असून आमच्या राज्य पक्षाध्यक्षांनी असा कुठलाही आदेश दिला नव्हता, अशी माहीती खुद्द पवार यांनी दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी 50 हजार मदत द्या | अशोक चव्हाण

News Desk

…नाहीतर त्यांनी माझ्या नेतृत्त्वाखाली काम करावे | रामदास आठवले

News Desk

माझ्या नादी लागू नका, घरात घुसून ठोकून काढेन | सुप्रिया सुळे

News Desk
महाराष्ट्र

अंत्ययात्रेदरम्यान पूल कोसळून २५ जण नदीत कोसळले

News Desk

सातारा | मृत झालेल्या व्यक्तीच्या अंत्ययात्रा जात असतानाच अचानक पूल कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात मृतदेहासह २५ जण नदीत कोसळले आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील खरोशी गावात घटना घडली असून या घटनेत ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना रविवारी (३० डिसेंबर) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

हा पूल नादुरुस्त अवस्थेत होता व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गेल्या २० वर्षांपासून याची कोणतीही डागडुजी झाली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर या आपघातात रमेश भीमराव कदम व रमेश (मुल्या) धोंडू कदम हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी पाचगणी येथील रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, महाबळेश्वरपासून अंदाजे ४० किमी अंतरावर खरोशी गावात कृष्णाबाई कदम यांना अंत्यसंस्कारासाठी नेत असताना गावाच्या मंदिराजवळ असलेला वीस वर्ष जुना लोखंडी पूल कोसळला यामध्ये भीमराव भागू कदम, अशोक चांगु कदम, शंकर चांगु कदम, रामचंद्र कदम, विजय शंकर कदम, राजेश शंकर कदम, रमेश भीमराव कदम व रमेश (मुल्या) धोंडू कदम हे जखमी झाले.

Related posts

मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवून शिवसेनेचा माज उतरवू – देवेंद्र फडणवीस 

News Desk

गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला दिल्या शुभेच्छा…!

Aprna

राज्याच्या विकासाला चालना देणारा, सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प ! – नाना पटोले

Aprna