HW News Marathi
राजकारण

“हर हिंदू की यही पुकार पहले मंदिर फिर सरकार”, शिवसेनेचा नवा नारा

मुंबई | शिवसेना येत्या २५ नोव्हेंबरला अयोध्या दौऱ्यावर जाण्याची जय्यत तयारी सुरू आहे. अयोध्ये दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने “हर हिंदुकी एकही पुकार..पहिले मंदिर फिर सरकार“, असा नवा नारा दिला आहे. अयोध्या दौऱ्याच्या तयारीची माहिती देण्यासाठी महत्त्वाची बैठक आज (१८ नोव्हेंबर)ला सेनाभवनात पार पडली आहे. यावेळी राज्यातील शिवसेनेचे सर्व जिल्ह्याप्रमुख, संपर्कप्रमुख आणि विभागप्रमुख उपस्थित होते.

अयोध्या हे छोटे शहर असून राज्यातून मोठ्या संख्येने शिनसैनिक व पदाधिकारी यांनी अयोध्येला येण्यापेक्षा आपल्या भागात आणि राज्यातील ३५० तालुक्यांमध्ये २४ व २५ नोव्हेंबरला महाआरती, रॅली, अयोध्येत राम मंदिर बांधण्याची मागणी शिवसेना करण्यासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करून अयोध्येत राम मंदिराची आठवण सरकारला द्यावी, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ठाकरे येत्या २५ नोव्हेंबरला अयोध्येत काय बोलणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘सत्यमेव जयते’वर ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ने मात केली आहे काय?

News Desk

सभागृहाच्या कामकाजात भाजपचा अडथळा

News Desk

निवडणुकांपूर्वी झालेल्या या चौकीदारांच्या चौक्या आम्ही बंद करू !

News Desk
राजकारण

उपोषण मागे, मराठा समाजाचा आंदोलन सुरूच

News Desk

मुंबई | सकल मराठा क्रांती महामोर्चाने गेल्या १६ दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण अखेर मागे घेतले आहे. मराठा आरक्षणासाठी हे आमरण उपोषण सुरू केले होते. सरकार आरक्षण देणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा मराठा समाजाच्यावतीने दिला होता. परंतु रविवारी सकाळी मराठा समाजाकडून आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हे आमरण उपोषण मागे असल्याची माहिती प्रा. संभाजी पाटील यांनी दिली आहे.

आता आंदोलन करू नका, १ डिसेंबरला जल्लोष करा’ असे विधान करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत आश्वासन दिले होते. यानंतर देखील सकल मराठा क्रांती महामोर्चाने आमरण उपोषण मागे घेतले नाही. मुख्यमंत्र्यांच्यावतीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजय यांनी उपोषणाला बसलेल्यांची भेट घेऊ विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेनाच्या पहिल्याच दिवशी मराठा आरक्षणाबाबत दोन्ही सभागृहांची मंजुरी घेऊन त्याचे कायद्यात रुपांतर करून घेण्यासाठी सरकारला भाग पाडावे. तसेच आमरण उपोषण मागे घेण्यात आले असले तरी आरक्षणाची घोषणा होईपर्यंत आणि इतर मागण्यांची पूर्तता होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी घोषणाही पाटील यांनी पत्रकार परिषेदत केली आहे.

Related posts

पर्रीकर आज गोव्यात दाखल होणार !

News Desk

एमएमआरडीएचा विस्तार होणार, राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

News Desk

मुख्यमंत्र्यांची विखे-पाटील यांना अवमानता नोटीस

News Desk