HW News Marathi
राजकारण

राम मंदिर बांधून कुणाचे पोट भरणार असेल तर आमचा नक्कीच पाठिंबा असेल !

पुणे | राम मंदिर बांधून कुणाचे पोट भरणार असेल तर आम्ही नक्कीच पाठिंबा देऊ. परंतु बेरोजगारी, कुपोषण हे प्रश्न राम मंदिर बांधूनही कायम रहाणार असतील तर त्याचा उपयोग काय ? अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांकडून देखील राम मंदिर बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी होताना पाहायला मिळत आहे.

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांनी काल (मंगळवार) त्यांची बाजू चौकशी आयोगासमोर मांडली. प्रकाश आंबेडकर यांनी चौकशी आयोगासमोर सांगितले की, “१ जानेवारी २०१८ रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास भीमा-कोरेगाव येथे हिंसाचारास सुरुवात झाली. मला माहिती मिळताच मी लगेच पुणे ग्रामीण पोलिसांशी फोनवरुन संपर्क साधायचा प्रयत्न केला. पण मला पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही.” मुख्यमंत्री, सचिव, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, केंद्रीय गुप्तचर संघटना, पालकमंत्री गिरीश बापट आणि पोलीस प्रशासन हे सर्व या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिवसेनेचे विचार प्रतिगामी, नवाब मलिकांची शिवसेनेवर टिका

News Desk

मी कधीही गरिबांचे पैसे लुटण्याचे पाप केले नाही !

News Desk

BharatBandh | भारत बंदला पुण्यात हिंसक वळण

News Desk
राजकारण

ना दलित, ना मुसलमान ‘जाट’ आहेत हनुमान !

News Desk

लखनऊ | गेल्या काही दिवसांपासून भगवान हनुमान हे नेमक्या कोणत्या जातीचे आहे. यावरून उत्तर प्रदेशात चांगलेच राजकारण पेटले आहे. या वादात आता उत्तर प्रदेशमधील मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी म्हटले की, ”जाट हे भगवान हनुमानाचे वंशज आहेत”, असे वादग्रस्त विधान केले आहे. याआधी उत्तर प्रदेशमधील विधान परिषदेचे भाजपचे आमदार बुक्कल नवाब यांनी हनुमान हे मुस्लीम होते, असे वादग्रस्त विधान केले आहे.तर आता आणखी एका मंत्र्यांने हनुमान हे जाट समाजातील होते, असा दावा केला आहे.

याआधी उत्तर प्रेदशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमान हे दलित असल्याचे वक्तव्य केले होते. जैन धर्मगुरू आचार्य निर्भय सागर महाराज यांनी, हनुमान हे जैन होते, असा दावा केला होता. हनुमान यांच्या जातीवरून वेगवेगळे दावे केले जात असल्याने आता नव्यावादाची ठिणगी पडली आहे. या वादात हनुमान यांचे नाव रोज एका जातीशी जोडले जात आहे.

नारायण चौधरी नेमके काय बोलेले

”जाट हे भगवान हनुमानाचे वंशज आहेत”, असे वादग्रस्त विधान उत्तर प्रदेशमधील धार्मिक व्यवहार मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी केले आहे. ‘भगवान श्रीराम यांची पत्नी देवी सीता यांचे रावणाने अपहरण केले. त्यानंतर हनुमान यांनी लंकेचे दहन केले. ज्यावेळी कोणावर अन्याय होतो तेव्हा तिथे जाट हस्तक्षेप करतात. हा जाट समाजाचा नैसर्गिक गूण आहे. हनुमान देखील देवी सीतेच्या रक्षणासाठी धावून गेले. यामुळे हनुमान हे जाट असल्याचे सिद्ध होते, असे चौधरी यांनी म्हटले आहे.

 

Related posts

…तर पवारांची औलाद म्हणून सांगणार नाही !

Gauri Tilekar

#LokSabhaElections2019 : गोव्यात शिवसेना-भाजपची युती नाही !

News Desk

खड्ड्यांवरुन मनसे पुन्हा एकदा आक्रमक, मंत्रालयासमोर मध्यरात्री खोदला रस्ता

News Desk