HW News Marathi
राजकारण

महाआघाडीचा तिढा अखेर सुटला, काँग्रेस २४ तर राष्ट्रवादी २० जागांवर निवडणुका लढविणार

मुंबई | लोकसभा निवडणुकीसाठी महाआघाडीच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटा आहे. निवडणुकीसाठी ४८ जागांपैकी काँग्रेस – २४ तर राष्ट्रवादी – २०, बहुजन विकास आघाडी – १, स्वाभिमानी शेतकरी संघटना – २ आणि युवा स्वाभिमानी – १ महाआघाडीत अशाप्रकारचे जागावाटप झाले आहे. महाआघाडीचे जागावाटप झाल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, राजू शेट्टी आदी नेते यावेळी उपस्थित होते.

महाआघाडीचे जागावाटप ठरले असले तरी काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या पत्रकार परिषदेत अनुपस्थिती चर्चा विषय ठरले. विखे-पाटील यांच्या राजीनाम्यावर देखील सस्पेंस कायम आहे. विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे हे बंडखोरी करत भाजपमध्ये डेरेदाखल झाले आहेत. त्यांना नगर दक्षिणमधून भाजपने लोकसभेचे तिकीट दिले आहे. सार्वत्रिक निवडणुकांसांठी या महाआघाडीत आणखीण काही पक्षांनी सामील व्हाव, पण भाजपकडून साम दाम दंड भेदाचे राजकारण करण्यात येते आहे. त्याला काही पक्ष बळी पडत असल्याची टिका अशोक चव्हाण यांनी केली आहे.

असे आहे महाआघाडीचे जागावाटप

  • काँग्रेस – २४
  • राष्ट्रवादी – २०
  • बहुजन विकास आघाडी – १
  • स्वाभिमानी शेतकरी संघटना – २
  • युवा स्वाभिमानी – १
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ममता या पश्चिम बंगालची संस्कृती, लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत !

News Desk

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी होऊ शकतो राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार

News Desk

#NoMoreModi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आंध्र प्रदेशातील सभेपुर्वी विरोधकांची पोस्टरबाजी

News Desk