HW News Marathi
राजकारण

पक्षातील ‘गद्दारांना’ शोधा, ममता बॅनर्जींचा आदेश

नवी दिल्ली | लोकसभेच्या निवडणुकीत १२९ विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपला मोठे यश आले तर अन्य ६० विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपला तृणमूल काँग्रेसपेक्षा फक्त ४ हजार मते कमी मिळाली आहेत. या परिस्थितीस जबाबदार असलेल्या पक्षातील नेत्यांची माहिती काढण्याचे आदेश ममता बॅनर्जी यांनी दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये आलेल्या या पराभवानंतर संतापलेल्या टीएमसी अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी तृणमुल काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांना पक्षातील ‘गद्दार’ नेत्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत.

पश्चिम बंगालच्या उत्तर पश्चिम भागातील एकूण १९२ विधानसभा मतदारसंघ ‘अशांत’ म्हणून गणले जातात. आदिवासीबहुल क्षेत्र असलेल्या जंगलमहाल आणि उत्तर बंगाल भागातील गरिबांनी तृणमूल काँग्रेसला मतदान केले नसल्याचे तृणमूल काँग्रेसच्या आंतरिक सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. यामुळेही ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचप्रमाणे अद्याप राज्यात ७ वे वेतन आयोग लागू न केल्याचा फटका देखील ममता बॅनर्जी यांना बसला आहे. येथील ७० लाख सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी देखील तृणमूल काँग्रेसला मतदान केले नसल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात जनतेवर विषप्रयोग करणारे सरकारः खा. अशोक चव्हाण

News Desk

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या महाराष्ट्रात १ हजार जाहीर सभा

News Desk

संतापजनक ! नांदेडमध्ये २ शिक्षकांकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

News Desk