HW News Marathi
राजकारण

गणपती बाप्पा ‘ईडी’चे विघ्न नक्कीच दूर करेल !

मुंबई | ‘गणपती बाप्पा ‘ईडी’चे विघ्न नक्कीच दूर करेल,’ असा विश्वास महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी व्यक्त केला. कोहीनूर स्केअर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जोशींचा चिरंजीव उन्मेष जोशी यांची काही दिवसांपूर्वीच अंमलबजावणी संचलनलाय (ईडी)ची चौकशी झाली आहे. जोशींच्या घरी आज (२ सप्टेंबर ) गणेरायाचे भक्ती भावाने प्रतिष्ठापणा करण्यात आली. त्यावेळी जोशींनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती म्हटले आहे.

सरकारी क्षेत्रातील कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियर सर्व्हिसेसद्वारे (आयएलएफएस) मुंबईच्या कोहिनूर सीटीएनएल कंपनीला ८६० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. राज ठाकरे, राजेंद्र शिरोडकर आणि उन्मेष जोशी यांनी कोहिनूरसाठी जागा खरेदी घेतली होती. मात्र त्यानंतर आयएलएफएसचे मोठे नुकसान झाले होते. पुढे २००८मध्ये राज यांनी शेअर्स विकून या कंपनीतून अंग काढून घेतले होते. मात्र त्यानंतरही राज या कंपनीत सक्रिय असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिद्धू पाकिस्तानचे एजंट | हरसिमरत कौर

News Desk

राज्यातील दुष्काळाबाबत चर्चेसाठी शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

News Desk

काँग्रेसच्या ‘या’ नेत्याने पक्षाला दिली सोडचिठ्ठी

Aprna