HW News Marathi
राजकारण

ऐरोलीतून गणेश नाईक यांना उमेदवारी, संदीप नाईक यांची माघार

मुंबई | आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सोमवारी (१ ऑक्टोबर) पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. मात्र, आता उमेदवारीवरून नाराजी नाट्याला सुरुवात झाली. भाजपच्या या पहिल्या यादीत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या संदीप नाईक यांना ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली तर बेलापूर मतदारसंघातून विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले राष्ट्रवादीचे बेलापूरचे माजी आमदार गणेश नाईक नाराज होते. याच पार्श्वभूमीवर, आता आपल्या वडिलांसाठी संदीप नाईक यांनी ऐरोली मतदारसंघातून माघार घेऊन गणेश नाईक यांच्याकरिता हा मतदारसंघ सोडला आहे. अखेर संदीप नाईक यांच्या जागी भाजपकडून ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले गणेश नाईक हे राष्ट्रवादीचे बेलापूर मतदारसंघाचे माजी आमदार होते. त्यामुळे, त्यांच्या भाजप प्रवेशाला भाजपच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांचा तीव्र विरोध होता. कारण, गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाने मंदा म्हात्रे यांनी डावलले जाण्याची शक्यता होती. मात्र, भाजपने मंदा म्हात्रे यांना नाराज न करता उमेदवारी दिली. परंतु, गणेश नाईक या मतदारसंघातून इच्छुक असल्याने ते मात्र नाराज झाले. त्यामुळे, संदीप नाईक यांनी आपल्या वडिलांसाठी ऐरोली मतदारसंघातून माघार घेतली. त्यामुळे आता या मतदारसंघातून गणेश नाईक यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकसभा निवडणुका लढविण्यास मनसे इच्छुक नाही ?

News Desk

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आज मनसेचा पदाधिकारी मेळावा

News Desk

राहुल यांच्या मुंबई दौ-याला सुरुवात

News Desk