HW News Marathi
राजकारण

महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात जरी लावला, तर माझ्याशी गाठ

मुंबई । “महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात जरी लावला, तर गाठ माझ्याशी, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेनी भाजपचे आमदार राम कदम यांना खडसावले आहे. सुप्रिया सुळे यांनी इंदापूर आणि दौंडच्या दौ-यावर असून या दरम्यान एका कार्यक्रमात राम कदम यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात बेताल वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.

पुरोगामी महाराष्ट्रात एक आमदार महिलांना आणि मुलींना पळवून नेण्याची भाषा करत असेल, तर यासारखा काळा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात नाही. परंतु संघर्षाची वेळ आल्यास याच सावित्रीची लेक झाशीची राणी झाल्याशिवाय राहणार नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

तसेच सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत “आमदार राम कदम यांच्या महिलांविषयी अश्लाघ्य वक्तव्यावर अद्याप मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया नाही. यावरून राम कदम प्रवृत्तीला भाजपाची मूकसंमती आहे असे समजावे का?” असा सवाल उपस्थित करून #जवाबदो हॅश टॅग देत मुख्यमंत्र्यांना उत्तर विचारले आहे.

नेमके राम कदम काय म्हटले?

“तुमचे आईवडील म्हटले, साहेब आम्हालाही पोरगी पसंत आहे,तर काय करणार मी? तिला पळवून तुमच्याकडे आणणार, असे विवादीत विधान केले.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्यातील मोठे प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार ‘ब्र’ सुद्धा काढत नाहीत! – सुभाष देसाई

Aprna

सीमावादावर ‘मविआ’च्या खासदारांची शाहांसोबत चर्चा; बोम्मईंने ट्वीट करत पुन्हा महाराष्ट्राला डिवचले

Aprna

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी घेतला अखेरचा श्वास

News Desk
राजकारण

येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार?

News Desk

लखनऊ । आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष एकत्र येण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु, काँग्रेसचे महासचिव गुलाम नबी आझाद यांनी आगामी निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढू शकते असे, म्हटल्याने महाआघाडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पक्षासाठी झटून काम करणाऱ्यांनाच पद मिळणार

बाराबंकी येथे जीआयसी ग्राऊंडवर पार पडलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आझाद यांनी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी सक्षम असल्याचे म्हटले. ‘काँग्रेसने जरी महाआघाडीसाठी पुढाकार घेतला असला तरी आम्ही स्वत:च्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास तयार आहोत. तसेच पक्षासाठी झटून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच पद दिले जाईल,’ असेही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितले.

समाजवादी पक्ष काँग्रेसला राज्यातील केवळ रायबरेली आणि अमेठी या दोनच जागा देण्यासाठी तयार असल्यानेच इतर पक्षांवर दबाब टाकण्यासाठी आझाद यांनी स्वबळावर लढण्याचे वक्तव्य केले असल्याचे समजते.

राज बब्बर बरळले

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केले. ‘समाजवादी पक्षातील अंतर्गत वादात आम्ही नाक खुपसत नाही. ती काँग्रेसची संस्कृती नाही ही भाजपची विशेषतः पंतप्रधानांची सवय आहे. ते दुसऱ्यांच्या बाथरुममध्ये डोकावतात,’ असे ते म्हणाले.

Related posts

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्ध्वस्त धर्मशाळेतून बरेच लोक भाजपच्या पक्क्या घरात प्रवेश !

News Desk

चंद्रकांत खैरे यांचा पराभव हा माझा पराभव !

News Desk

“मुख्यमंत्र्यांसोबत जाऊन बच्चू कडू यांनी स्वाभिमान गहाण ठेवला”, सुषमा अंधारेंची टीका

Aprna