HW News Marathi
राजकारण

हनुमान हे खेळाडू होते !

नवी दिल्ली | श्री रामप्रभुंचे भक्त असलेल्या हनुमान यांच्या जातीवरील चर्चेला राजकीय दृष्ट्या विषेश महत्व दिल्याचे पहायला मिळत आहे. सध्या हनुमान यांच्या जातीमुळे गोंधळ निर्माण झालेला पहायला मिळत आहे. या वादात आणखी एका नेत्याने उडी घेतली आहे. माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशचे मंत्री चेतन चौहान यांनी हनुमान हे खेळाडू होते, असे म्हटले आहे. एका कार्यक्रमावरील चर्चेत हनुमान यांच्यावरील चर्चासत्रात ते बोलत होते.

हनुमान कोण होते, याबाबत बोलताना चौहान यांनी त्यांच्या जातीचा उल्लेख केला नाही. मात्र, हनुमान कुस्ती खेळत होते, ते एक खेळाडू होते. जे पैलवान आहेत, ते सर्वच हनुमानाची पूजा करतात. त्यामुळे मी ही त्यांना तेच मानतो, ते माझ्यासाठी पूजनीय आहेत. देवाची कुठलिही जात-पात नसते, त्यामुळे मी त्यांना कुठल्याही जातीच्या चौकटीत बांधू इच्छित नाही, असे चौहान यांनी म्हटले आहे.

दरम्यान, यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनी हनुमान हे दलित होते, असा दावा केला होता. तर, भाजपा आमदार बुक्कल नवाब यांनी हनुमान हे मुस्लीम होते, असे म्हटले आहे. तसेच योगी कॅबिनेटमधील आणखी एक मंत्री चौधरी लक्ष्मी नारायण यांनी हनुमान हे जाट समाजाचे होते, असा दावा केला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीचे राजकारण करताना राम मंदीर बनेल की नाही ही शंका आहे. परंतु आगामी काळात हनुमानाविषयी रामायण होईल यात काहीही शंका नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राफेल विमानावरून पवारांचा युटर्न

News Desk

‘मीटू’ मोहिमेच्या तक्रारीनंतर लवकरच कायदेतज्ज्ञाची समिती

swarit

तृणमूल काँग्रेसने फेटाळला ममता बॅनर्जींचा राजीनाम्याचा प्रस्ताव

News Desk
राजकारण

हिजड्याचे लग्न झाले तर त्याला मुले होतील, पण सिंचन योजना पूर्ण होणार नाही !

News Desk

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कर्जबुडव्या विजय मल्ल्याची बाजू घेऊन सारवासारव केली होती. आता पुन्हा एकदा आणखी एक वादग्रस्त विधानामुळे चर्चेचा विषय ठरले आहेत. ‘एकवेळ हिजड्याचे लग्न झाले तर त्याला मुले होतील. मात्र सिंचन योजना पूर्ण होणार नाही, असे आम्हाला वाटलेहोते. मात्र भाजप सरकारने सिंचन योजना पूर्ण करुन दाखवली,’ असे गडकरी म्हणाले. गडकरी यांनी आज (२३ डिसेंबर) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वरील सांगली-सोलापूर मार्गाचे चौपदरीकरण व राष्ट्रीय महामार्गच्या दुरुस्ती कामांचे कोनशिला अनावरण आणि सिंचन योजनांच्या मुख्य कामांच्या पूर्णत्वाचा वचनपूर्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना गडकरी यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.

शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना सिंचनावर बोलत असताना गडकरींची जीभ पुन्हा घसरली. टेंभू सिंचन योजनेविषयी बोलताना गडकरींनी वादग्रस्त विधान केले. ‘टेंभू योजना अनेक वर्षांपासून अर्धवट होती. ही योजना कधी पूर्ण होईल, असे आम्हालादेखील वाटले नव्हते. खरंतर हे इथे बोलू नये. पण बोलतो. एकवेळ हिजड्याचे लग्न झाले तर त्याला मुले होतील. पण सिंचन योजना पूर्ण होणार नाही. मात्र भाजपसरकारच्या काळात ही योजना पूर्ण झाली. शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण झाले. टेंभूसारख्या अनेक महत्त्वाच्या आणि महत्त्वाकांक्षी योजना भाजप सरकारच्या कार्यकाळात पूर्णत्वास गेल्या,’ असे गडकरी म्हणाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट उपस्थित होते.

Related posts

कोण आहेत राष्ट्रवादीचे ३१ प्रवक्ते ?  

News Desk

पियुष गोयल यांना स्वतःचा फोटो पोस्टरवर आवडत नाही !

News Desk

#RamMandir : काँग्रेसने पाठिंबा दिला तर २ मिनिटांमध्ये अयोध्येत राम मंदिर बनेल !

News Desk