HW News Marathi
राजकारण

हिजड्याचे लग्न झाले तर त्याला मुले होतील, पण सिंचन योजना पूर्ण होणार नाही !

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कर्जबुडव्या विजय मल्ल्याची बाजू घेऊन सारवासारव केली होती. आता पुन्हा एकदा आणखी एक वादग्रस्त विधानामुळे चर्चेचा विषय ठरले आहेत. ‘एकवेळ हिजड्याचे लग्न झाले तर त्याला मुले होतील. मात्र सिंचन योजना पूर्ण होणार नाही, असे आम्हाला वाटलेहोते. मात्र भाजप सरकारने सिंचन योजना पूर्ण करुन दाखवली,’ असे गडकरी म्हणाले. गडकरी यांनी आज (२३ डिसेंबर) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वरील सांगली-सोलापूर मार्गाचे चौपदरीकरण व राष्ट्रीय महामार्गच्या दुरुस्ती कामांचे कोनशिला अनावरण आणि सिंचन योजनांच्या मुख्य कामांच्या पूर्णत्वाचा वचनपूर्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना गडकरी यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.

शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना सिंचनावर बोलत असताना गडकरींची जीभ पुन्हा घसरली. टेंभू सिंचन योजनेविषयी बोलताना गडकरींनी वादग्रस्त विधान केले. ‘टेंभू योजना अनेक वर्षांपासून अर्धवट होती. ही योजना कधी पूर्ण होईल, असे आम्हालादेखील वाटले नव्हते. खरंतर हे इथे बोलू नये. पण बोलतो. एकवेळ हिजड्याचे लग्न झाले तर त्याला मुले होतील. पण सिंचन योजना पूर्ण होणार नाही. मात्र भाजपसरकारच्या काळात ही योजना पूर्ण झाली. शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण झाले. टेंभूसारख्या अनेक महत्त्वाच्या आणि महत्त्वाकांक्षी योजना भाजप सरकारच्या कार्यकाळात पूर्णत्वास गेल्या,’ असे गडकरी म्हणाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊत यांना आज पुन्हा एकदा PMLA न्यायालयात हजर करणार; जामीन की कोठडी?

Aprna

पद्मावत सिनेमा पाहण्यासाठी वेळ आणि पैसा वाया घालवू नका – ओवीसी

swarit

तृणमूल काँग्रेसने फेटाळला ममता बॅनर्जींचा राजीनाम्याचा प्रस्ताव

News Desk