HW News Marathi
राजकारण

चोराच्या उलट्या बोंबा

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आंग्रिया क्रूझवरील सेल्फी काढतानाच्या व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीक होत आहे. यानंतर “मी तिथे सेल्फीसाठी नव्हे तर ताजी हवा खाण्यासाठी गेली,” असल्याचे स्पष्टीकरण पहिल्यांदाच अमृता फडणवीस यांनी दिले आहे. “मी ज्य जागेवर बसले होते, ती जागा सुरक्षितच होती, असा दावा देखील त्यांनी केला. माझ्यावर कारवाई केल्याने एखाद्या माणसाचे जरी भले होत असेल, तर कारवाई करण्यात यावी, असे अमृता फडणवीस म्हटल्या आहेत.

संपूर्ण भारतीय बनावटीची पहिला क्रूझ असलेल्या आंग्रियाचे उद्घाटन शनिवारी झाले. या कार्यक्रमाला केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. यावेळी अमृता फडणवीस यांनी क्रूझच्या टोकाला बसून सेल्फी काढला. विशेष म्हणजे, पोलीस यंत्रणांसह इतरही अधिकारी फडणवीसांचा सेल्फी स्टेट पाहात असल्याचे व्हिडीओत दिसून आले. यावरुन अमृता फडणवीस सोशल मीडियावर ट्रोल झाल्या होत्या. मात्र सेल्फी काढलेली जागा पूर्णपणे सुरक्षित होती, असा दावा अमृता फडणवीस यांनी केला आहे.

या व्हिडीओमध्ये एक महिला पोलीस अधिकारी रश्मी करंदीकर आणि गार्डला यांनी अमृता यांना परिस्थितीची जावी करून दिली. तरी देखील अमृता फडणवीस जागेवरून हटल्या नाही. पुढच्या काही सेकंदांतच आपल्या मोबाईलमध्ये सेल्फी घेताना दिसतात. पण, अमृता फडणवीस यांनी सुरक्षा मोडून हा सेल्फी स्टंट का केला असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

योगी आदित्यनाथ यांची ओवेसींना धमकी ?

News Desk

भगवानगडाला शह देण्यासाठी सावरगावला भगवान बाबांचे नवे स्मारक उभारणार | पंकजा मुंडे

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात उभे असलेल्या तेज बहादूर यांची उमेदवारी रद्द

News Desk
क्राइम

फेसबुक पोस्टमुळे काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या

swarit

मुंबई | फेसबुकवर स्थानिक आमदाराबाबत पोस्ट टाकल्याच्या रागातून भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर तलवार हल्ला करून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना घाटकोपरच्या असल्फा परिसरात घडली असून साकीनाका पोलिसांनी या प्रकरणी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली असून चौकशी सुरु आहे.

भाजपच्या स्थानिक आमदाराबाबत टीका करणारी पोस्ट काँग्रेसच्या मनोज दुबे नावाच्या कार्यकर्त्यांनी केसबुकवर टाकली होती. या पोस्टवरून फेसबुकवरच भाजप कार्यकर्त्यांसोबतद वादावादी झाला होता. या वादानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (२२ ऑक्टोबर) मध्यरात्री दीड-दोनच्या सुमारास दुबे यांना असल्फा मेट्रो स्थानकाजवळ एकटे गाठून पुन्हा फेसबुक पोस्टवरून वादा घातला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी दुबे यांच्यावर तलवारीने वार करून हत्या करण्यात आली.

 

 

Related posts

बलात्कारावरील निर्णयावर तापसी पन्नू, सोना मोहापात्रा संतप्त… ही आली प्रतिक्रिया

News Desk

अभिनेत्री कृतिका चौधरी हिच्या हत्येचा तपास करण्यात एक महिन्यानंतर पोलिसांना यश

News Desk

बायपास सर्जरीनंतर सचिन वाझेनी 3 महिने घरात नजरबंद ठेवण्याची केली मागणी

News Desk