HW News Marathi
राजकारण

मला १००० % विश्वास आहे कि टीडीपी विजयी होईल !

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकांचा अंतिम टप्पा पार पडल्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोल्सनुसार यंदा केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, आता निकालानंतरच्या रणनीतीसाठी देशातील विरोधी पक्षांकडून वेगाने पावले उचलली जात आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू हे अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्याचप्रमाणे नायडू सोमवारी (२० मे) ममता बॅनर्जी यांची देखील भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

“मला १००० % विश्वास आहे कि टीडीपीला विजय मिळेल. याबाबतीत मला ०.१% देखील शंका नाही. आम्ही जिंकणारच आहोत,” असा विश्वास चंद्राबाबू नायडू यांनी एक्झिट पोलसंदर्भात बोलताना व्यक्त केला आहे. यावेळी नायडू यांनी निवडणूक प्रक्रियेतील अडचणींच्या मुद्द्यावर देखील भाष्य केले आहे. “मतगणनेच्या प्रक्रियेत अनेक समस्या आहेत. निवडणूक आयोगाने या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा. ईव्हीएमबाबत देखील लोकांना अनेक शंका आहेत”, असेही नायडू यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चव्हाण ७०,००० कोटी खर्च केले…पाणी कुठे गायब झाले ?

News Desk

#Election2019 : जाणून घ्या…चंद्रपूर मतदारसंघाबाबत

News Desk

भाजपाच्या या निर्णयामागे संघाचा हात ?

News Desk