HW News Marathi
राजकारण

भाजप काँग्रेसला घाबरल्यामुळे मला नजरकैद | संजय निरुपम

मुंबई | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज मुंबईत दाखल झाले आहे. या भेटीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांना नजर कैदेत ठेवण्यात आले असून घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहा यांच्या मुंबई दौऱ्यात निरुपम यांनी कोणताही अडथळा निर्माण करु नये. म्हणून निरुपम यांना त्यांच्या राहत्या घरी नजर कैदेत ठेवण्यात आले आहे.

शहा हे सध्या भाजपच्या संपर्क अभियानासाठी मुंबईत आले आहेत. संपर्क वाढविण्यासाठी शहा यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची भेट घेतली असून यानंतर सह्याद्री अतिथीगृहात भाजप राज्य निवडणूक प्रचार समितीची बैठक घेण्यात येणार आहे. सायंकाळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच उद्योगपती रतन टाटा, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची देखील भेट घेणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कदाचित मुख्यमंत्री माझ्या भाषणाला घाबरले असतील !

News Desk

शिवसेना-मनसेत पुन्हा पोस्टर वॉर

swarit

उद्धव ठाकरे एनडीएच्या मेजवानीसाठी दिल्लीत जाणार

News Desk
राजकारण

अमित शहा, उद्धव ठाकरे यांची भेट घेणार ?

News Desk

मुंबई | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज मुंबईत आहेत. या एकदिवसीय मुंबई दौ-यात अमित शहा जनसंपर्क वाढविण्यासाठी अनेक लोकांच्या भेटी घेणार आहेत. परंतु अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीची विषेश चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली पहायला मिळत आहे. परंतु सामनातून शिवसेनेने घेतलेली वेगळी भूमिका पहाता आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अमित शहा भेटणार की नाही याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.

अमित शहा यांच्या सुधारीत अधिकृत वेळापत्रकात उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा उल्लेख नसल्यामुळे राजकीय चर्चेला उधान आले आहे. सामना मधून झालेल्या टिकेनंतर अमित शहा उद्धव ठाकरे यांची भेट घेणार का ? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अमित शहा यांच्या आधीच्या वेळापत्रकात ७.३० च्या सुमारास सायंकाळी अमित शहा उद्धव यांची भेट घेणार होते. त्यामुळे वेळापत्रकाच्या बदलानुसार शिवसेनेच्या टीकेनंतर भाजप अध्यक्षांनी प्लॅन बदलला तर नाही ना असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

Related posts

भाजपच्या पराभवासाठी शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात

News Desk

देशाची अर्थव्यवस्था संकटात, नव्या अर्थमंत्र्यांनी मार्ग काढावा !

News Desk

काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर राहुल गांधींचा राजीनाम्याचा प्रस्ताव ?

News Desk