HW News Marathi
राजकारण

कोरेगाव-भीमा प्रकरण एनआयएकडे म्हणजे काही गोष्टी लपवायच्या आहेत !

जळगाव | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (१६ फेब्रुवारी) जळगावमधील पत्रकार परिषदेत भीमा-कोरेगाव प्रकरणी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “मी या सगळ्या केसेस तपासल्या. भीमा-कोरेगांव प्रकरण वेगळे आणि एलगार परिषदेमध्ये साहित्यिकांनी संताप व्यक्त करणारं लिखाण केलं, हा देशद्रोह आहे का हा खरा प्रश्न आहे. त्यांच्याविरोधात देशद्रोहाची कलमे लावून त्यांना तुरुंगात टाकलं, याविरोधात मी भांडतो आहे”, असे शरद पवार यांनी म्हटले. “माझं म्हणणं आहे की यात पोलिसांनी केलेली जी कारवाई आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. यासंदर्भात मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना मी पत्र लिहिले. एक रिटायर्ड हायकोर्ट जज नेमून हे प्रकरण योग्य आहे का हे तपासा. योग्य असेल तर माझी काही हरकत नाही. पण या प्रकरणाचा खोलात जाऊन तपास करावा”, अशी मागणीही शरद पवार यांनी यावेळी केली.

“राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी यासंदर्भात पोलिस अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. मात्र पोलीस अधिकारी आणि मंत्री यांच्यातील ही चर्चा सकाळी ९ ते ११ अशी झाली आणि चार वाजेपर्यंत केंद्र सरकारने ही केस आपल्याकडे काढून घेतली. घटनेने कायदा व सुव्यवस्थेचा अधिकार राज्य सरकारचा आहे. राज्यात घडलेल्या गोष्टीची सरकार चौकशी करत असते. ते सबंध प्रकरण एनआयएकडे देणे याचा अर्थ त्यांना काही गोष्टी झाकायच्या किंवा लपवायच्या आहेत. कारण हे प्रकरण झालं तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यांच्या कालखंडात ज्या गोष्टी घडल्या त्याची चौकशी झाली तर यातलं सत्य बाहेर येईल जे कदाचित त्यावेळच्या लोकांना सोयीचं नसावं. म्हणून दिल्लीच्या केंद्र सरकारने त्यांच्या मदतीसाठी हे सगळं चौकशीचं प्रकरण काढून घेतलं. आणि हे माझ्या मते योग्य नाही”, अशी तीव्र नाराजी शरद पवारांनी व्यक्त केली.

एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव घटनेचा संबंध नव्हता !

“भीमा-कोरेगांवमध्ये जे झालं त्यासंबंधी चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वी कमिशन नेमलं होतं. त्या काळात पुण्यात शनिवारवाडा येथे एल्गार परिषद झाली. या परिषदेचा आणि भीमा-कोरेगांव या घटनेचा संबंध नव्हता, मात्र दिवस एकच होता. सरकार विरोधी साहित्यिक कवी लेखक यांचा या परिषदेत सहभाग होता. त्यांनी आपली नाराजी काव्य किंवा लिखाणातून मांडली. ढवळे नावाचे कम्युनिस्ट विचाराचे एक गृहस्थ होते. त्यांची कविता अशी होती की, एक दलित तरुण संतापाने गावकऱ्यांना उद्देशून बोलतोय. आमच्या या आया-बहिणींवर अत्याचार झाले. आता आमची सहनशक्ती राहिलेली नाही. जो गाव बघ्याची भूमिका घेतो त्या गावालाच आम्ही आग लावू, अशी ती कविता होती. पोलिसांनी या काव्याला चिथावणी समजून त्यांना अटक करून टाकली”, असे शरद पवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात ७ जागांसाठी आज मतदान, दिग्गजांचे भवितव्य होणार सीलबंद

News Desk

१९८४ च्या शीखविरोधी दंगलीविषयी केलेल्या विधानाबाबत पित्रोदा यांनी माफी मागावी !

News Desk

किर्ती आझाद यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

News Desk