HW News Marathi
राजकारण

#RamMandir : श्रीराम संपूर्ण विश्वाचे तर मग मंदिर केवळ अयोध्येतच का ?

नवी दिल्ली | जर प्रभू श्रीराम हे संपूर्ण विश्वाचे आहेत तर मग त्यांचे मंदिर केवळ अयोध्येतच का ?, असा प्रश्न जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख फारूक अब्दुल्ला यांनी उपस्थित केला. फारूक अब्दुल्ला यांच्या या प्रश्नाला जदयू नेते पवन वर्मा यांनी प्रतिप्रश्न केला. ‘अयोध्या हे प्रभू श्रीराम यांचे जन्मस्थळ असून अयोध्येतच श्रीरामांचे मंदिर व्हावे ही हिंदूंची भावना असेल तर मग ते मंदिर का होऊ शकत नाही ? असा प्रश्न पवन वर्मा यांनी केला.

माजी केंद्रीय मंत्री मनिष तिवारी यांच्या या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी फारूक अब्दुल्ला यांनी पंतप्रधान मोदींवर देखील सडकून टीका केली. “मेरी माँ को गाली दिया, मेरे बाप को गाली दिया ?’ असे बोलणे पंतप्रधान मोदींना योग्य वाटते का ?, असा सवाल फारूक अब्दुल्ला यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आई-वडिलांचा भाषणात केलेल्या उल्लेखाबद्दलही फारूक यांनी टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रियांका गांधींनी लावला बैठकांचा सपाटा

News Desk

निवडणुकांसाठी पुणे पोलीस भाजपला मदत करत आहेत !

News Desk

सत्तेचा माज आला असेल तर ती सत्ता उलथवून टाकण्याची ताकद आमच्यात आहे !

News Desk