HW News Marathi
राजकारण

गरज पडली तर संघ राम मंदिरासाठी आंदोलन करेल | भय्याजी जोशी

मुंबई | भाईंदरच्या म्हाळगी प्रबोधिनीमध्ये आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. राम मंदिर बांधले जावे ही सर्वांचीच इच्छा आहे. संघाने न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान कधीही केलेला नाही. काही अडचणी जरूर येतील. परंतु न्यायालयाने हिंदूंच्या भावना लक्षात घेऊन निर्णय द्यावा,अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक भय्याजी जोशी यांनी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे राममंदिरासाठी गरज पडली तर पुन्हा आंदोलन उभारणार असल्याचा इशारा जोशी यांच्याकडून देण्यात आला आहे.

“राम मंदिर हा लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे. राम मंदिर अयोध्येतच होणार. मात्र खटला न्यायप्रविष्ट असल्याने त्याचा आधी निकाल लागायला हवा. राम मंदिरासाठी जमीन अधिग्रहण करण्याची मागणी मोठया प्रमाणावर होत आहे. त्यामुळे यासाठी कायदा आणायला हवा”, अशी मागणी देखील भय्याजी जोशी यांनी केली आहे. राममंदिर प्रकरणाचा निकाल लागण्यास होणारा विलंब वेदनादायी असल्याचे जोशी यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आम्ही ज्या दिशेने हवा असेल, त्या पक्षाला साथ देणार !

Gauri Tilekar

#LokSabhaElections2019 : पाटीदार सामाजाचे नेते हार्दिक पटेल आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

News Desk

#LokSabhaElections2019 : विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट न देण्याचा भाजपचा निर्णय

News Desk
राजकारण

सरकार तुमचे मग राम मंदिर का नाही?

News Desk

मुंबई | बासनात गेलेला राम मंदिराचा मुद्दा पुन्हा शिवसेनेमुळे चर्चेत आला आहे. सरकार तुमचे मग राम मंदिर का नाही?, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला केला आहे. पुढे असे देखील म्हणाले की, दिल्लीतील सरकार हे आरएसएसच्या आशीर्वादाने सत्तेते आहे. देशात पहिल्यांदा हिंदुत्त्वादी आणि मजबुत सरकार मिळाले असून देखील त्यांनी राम मंदिरचा मुद्दा बाजूला केला. आरएसएसला आंदोलन करण्याची वेळे येत मग तुमची मेहनत वाया गेली का?

मी २५ नोव्हेंबरला अयोध्येत त्या पाश्वभुमीवर उद्धव ठाकऱ्यांनी शिवसेनेनेच्या आमदार, खासदार आणि जिल्हाप्रमुखांची बैठक बोलविण्यात आली होती. पुढे १८ नोव्हेंबरला पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र दुष्काळाने आकराळ-विकराळ रुप धारण केले आहे. दुष्काळसदृश, दुष्काळ आणि दुष्काळजण असे सरकारने अनेक शब्दचे खेळ केले तरी देखील जनतेच्या मदतीला धावून जाणे हे शिवसैनिकांचे कर्तव्या आहे. फक्त दुष्काळ जाहीर करून काही होत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. तसेच दुष्काळ भागात प्राण्यासाठी चारा छावण्या आणि पाण्याचे टँकरची सोय करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

 

 

 

Related posts

काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

News Desk

सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी लिहलेले पत्र राष्ट्रपतींपर्यंत पोहचलेच नाही

News Desk

काँग्रेसने चॅकलेट चेहरा राजकारणात आणला !

News Desk