HW News Marathi
राजकारण

लेखी आश्वासनाची अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा थेट मंत्रालयावर धडकणार !

मुंबई | सरकारवर आमचा विश्वास नाही. परंतु केवळ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या लेखी आश्वासनामुळे आम्ही आमच्या गावी परतण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु जर या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी झाली नाही तर ३ महिन्यांनी थेट मंत्रालयावर धडकणार असल्याचा इशारा लोकसंघर्ष मोर्चाच्या महासचिव प्रतिभा शिंदे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ३ महिन्यांच्या आत लोकसंघर्ष शिष्टमंडळाला वनपट्टे आदिवासींच्या नावावर करण्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे या आदिवासी-शेतकऱ्यांनी त्यांच्या गावी परतण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारकडून लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा प्रतिभा शिंदे यांनी दिला होता. दरम्यान, गुरुवारी संध्याकाळी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून त्यांनी लेखी आश्वासन देण्यात आल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली. या लेखी आश्वासनानंतर अखेर आंदोलन मागे घेण्यासाठी शिष्टमंडळ आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाले. आदिवासी जमिनीच्या पट्टेधारकांना सर्व दुष्काळी सवलतीसह शेतीसाठी खावटी अनुदान देण्याबाबतचा निर्णय झाला असल्याची माहिती सरकारने दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरेंची भाजपला पहिल्यांदाच खुली ऑफर!

News Desk

#LokSabhaElections2019 : राजू शेट्टी आघाडीसोबत राहणार

News Desk

संयुक्त पत्रकार परिषदेत मी आणि उध्दव ठाकरे जे बोललो तेच अंतिम !

News Desk