HW News Marathi
राजकारण

मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करायचे असतील तर पैसे मोजावे लागणार !

मुंबई । मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करायचे असतील तर तुम्हाला रस्त्यासाठी चांगलेच पैसे मोजावे लागणार आहेत, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईकरांसोबत टोलचे राजकारण करणा-या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘द आयडिया ऑफ न्यू इंडिया’ (नव्या भारताची संकल्पना) या विषयावर व्याख्यान देण्यासाठी गडकरी प्रमुख वक्ते म्हणून आज वेलिंगकर इन्स्टिट्यूट उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते.

नितीन गडकरी यांनी असे देखील म्हटले की, मुंबईतील समुद्र आणि मीठी नदी स्वच्छ करणे हे अघड आहे. परंतु अशक्य नाही. यासाठी मुंबईकरांना पुढे यावे लागणार असल्याचे देखील गडकरी म्हणाले. या कार्यक्रमा दरम्यान उपस्थितानी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना ते बोलत होते.

गडकरी यांनी या कार्यक्रमा दरम्यान देशातील भविष्यात प्रदुषण कमी होण्यासाठी ई-सायकल, रिक्षा, टॅक्सीच्या सोयी करण्यात येणार आहे. तसेच आंतराराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाची किंमत वाढल्यामुळे इंधनदरात वाढ होत होती. परंतु देशात इंधन दर आयात करण्यापेक्षा देशातील इथेनॉल आणि मिथेनॉलची निर्मिती करण्याचे काम सुरू असल्याचे देखील त्यांनी म्हणाले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वैचारिक वारसदार !

News Desk

एका बापाचे असाल तर आमदारकीचा राजीनामा द्यावा! – संजय राऊत

Aprna

आगामी निवडणुकीत स्त्री हट्ट फडणवीसांना भोवणार का ?

News Desk