HW News Marathi
राजकारण

मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करायचे असतील तर पैसे मोजावे लागणार !

मुंबई । मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करायचे असतील तर तुम्हाला रस्त्यासाठी चांगलेच पैसे मोजावे लागणार आहेत, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईकरांसोबत टोलचे राजकारण करणा-या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘द आयडिया ऑफ न्यू इंडिया’ (नव्या भारताची संकल्पना) या विषयावर व्याख्यान देण्यासाठी गडकरी प्रमुख वक्ते म्हणून आज वेलिंगकर इन्स्टिट्यूट उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते.

नितीन गडकरी यांनी असे देखील म्हटले की, मुंबईतील समुद्र आणि मीठी नदी स्वच्छ करणे हे अघड आहे. परंतु अशक्य नाही. यासाठी मुंबईकरांना पुढे यावे लागणार असल्याचे देखील गडकरी म्हणाले. या कार्यक्रमा दरम्यान उपस्थितानी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना ते बोलत होते.

गडकरी यांनी या कार्यक्रमा दरम्यान देशातील भविष्यात प्रदुषण कमी होण्यासाठी ई-सायकल, रिक्षा, टॅक्सीच्या सोयी करण्यात येणार आहे. तसेच आंतराराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाची किंमत वाढल्यामुळे इंधनदरात वाढ होत होती. परंतु देशात इंधन दर आयात करण्यापेक्षा देशातील इथेनॉल आणि मिथेनॉलची निर्मिती करण्याचे काम सुरू असल्याचे देखील त्यांनी म्हणाले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिंदे गट दादरमध्ये नवे सेना भवन उभारणार; सदा सरवणकरांची माहिती

Aprna

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा जळगाव दौरा ‘या’ कारणामुळे झाला रद्द

Aprna

एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषदेचे नवे गटनेते

Aprna
राजकारण

देश धनवान मात्र जनता गरीब, हेच आपल्या देशाचे खरे चित्र !

News Desk

मुंबई | आपल्या देशाचे खरे चित्र म्हणजे देश धनवान आणि देशाची जनता गरीब असे आहे, असे विधान नितीन गडकरी यांनी केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आज हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने वेलिंगकर इन्स्टिट्यूटमध्ये ‘द आयडिया ऑफ न्यू इंडिया’ (नव्या भारताची संकल्पना) या विषयावर व्याख्यान देण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

आपल्या भारतात विचारधीनतेपेक्षा विचार शून्यांची संख्या मोठी आहे. जर आपल्या सुपरफास्ट व्हायचे असेल तर आपल्या देशातील प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींने पुढील ५० वर्षांसाठीचे व्हिजन तयार ठेवणे गरजेचे आहे, असे नितीन गडकरी यावेळी म्हणाले. यावेळी गडकरी भारताच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या अनेक विषयांवर आपले मत मांडले आहे.

नितीन गडकरी यांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे :

– राष्ट्रीय महामार्ग वाढविण्याचे कामे हाती घेतली असून सध्या तब्बल ७ लाख कोटींची कामे महाराष्ट्रात सुरू आहेत.

– मुंबई-दिल्लीमध्ये १४ लेन महामार्ग बांधण्यात येणार आहे. हा महामार्ग मुंबईपेक्षा देखील मोठा असणार आहे. दिल्ली ते जयपूर १ लाख कोटी रुपये खर्च करुन हा महामार्ग अडीच वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच दिल्ली ते मेरठ हायवे बांधण्यात येणार असून या मार्गामुळे ४० तासाचा प्रवास ४० मिनिटांमध्ये पार करता येणार आहे.

– मानस सरोवराला जाण्यासाठी चीन व नेपाळपासून जावे लागते. मात्र आता उत्तराखंडामध्ये हिचरा येथून सरळ मानस सरोवरला जाता यावे यासाठी काम सुरु असून ते काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. आता बद्रीनाथ केदारनाथ यांचे दर्शन घेण्यासाठी तुम्ही बाराही महिने जाऊ शकता. या कामात काही अडचणी आल्या नाहीत तर हा मार्ग जूनपर्यंत पूर्ण होईल.

– देशातील १७ ठिकाणी आम्ही एअरपोर्ट रोड बांधण्याचे काम सुरू आहे.

– मुंबई ते गोवा हा महामार्ग ऑगस्टमध्ये पूर्ण करण्यात येईल. ज्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढते. त्याप्रमाणात एक लेन सुरू करण्यासाठी करोडो रुपये लागतात.

– वाराणसी ते अलाहाबाद जलमार्गाने काम कुंभमेळ्याच्या आधी करण्यात येणार आहेत. अलाहाबादला १५० करोड लोक येणार आहेत. कुंभमेळ्यामध्ये जाण्यासाठी रिव्हर बोटद्वारे वाराणसी ते अलाहाबादला जाऊन गंगेत स्नान करून येऊ शकतात. हे काम जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहेत.

– मुंबईमध्ये नवीन क्रुझ टर्मिनज बांधण्यात येणार आहेत. यामुळे अडीज लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. ठाणे ते विरार १२ कोटी रुपये देण्यात येणार आहे. जेणेकरून जलमार्गाने काम सुरू करता येईल.

– मुंबईच्या विकासाठी जलमार्गावर भर देण्यात येणार आहे. सागरमाला प्रकल्प हा १६ लाख कोटींचा प्रकल्प बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे सव्वा लाख लोकांना रोजगार मिळेल.

– नागपूरच्या मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर ई-सायकल, रिक्षा, टॅक्सी या सोयी देण्यात येणार आहे. १० हजार कोटी इथेनॉल आपण तयार करणार आहेत. इथेनॉल हे कोळशापासून तयार करतात. आपण इथेनॉलपासून देशाची अर्थव्यवस्था बदलू शकतो. इथेनॉल, मिथेनॉलवर बस, दुचाकी, ई रिक्षा होणार आहे. त्यामुळे देशातील प्रदुषण कमी होणार आहे.

– गंगेला शुद्ध करण्यासाठी २५० घाट बांघण्यात येणार आहेत. मार्च अखेरपर्यंत गंगा ८०% ते ९०% शुद्ध करण्यात येणार आहे. मुंबईतील समुद्र आणि मिठी नदी सुंदर-शुद्ध करणे अवघड आहे पण अशक्य नाही. मुंबईतील समुद्र आणि मीठी नदीसाठी मुंबईकरांनाच आंदोलन करावे लागणार आहे

Related posts

मुख्यमंत्र्याचे शहर आणि राज्याची उपराजधानी असूरक्षित – जयंत पाटील 

swarit

शहा-फडणवीस भेटीत मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा ?

Gauri Tilekar

राज्यात येणार ते युतीचेच सरकार !

News Desk