HW News Marathi
राजकारण

मी फक्त रामासोबत आहे !

नवी दिल्ली । समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांची सून अपर्णा यादव यांनी अयोध्या राम मंदिरच्या विषयावर समर्थन केले. राम मंदिर हे अयोध्येत बांधले गेले पाहिजे.आणि त्याचे बांधकाम लवकरात लवकर सुरु करावे असे वक्तव्य अपर्णा यादव यांनी केले. आदित्य यादव यांच्यासोबत देवा शरीफ दर्गा येथे आल्या असताना अपर्णा यांनी ही प्रतिक्रिया दिली. आदित्य यादव हे शिवपाल यादव यांचे पुत्र आहेत.

राम मंदिर वादावर भाजपाला समर्थन देत आहात का ?, असे विचारले असता त्यांनी सांगितले की, कोणालाही समर्थन देत नाहीय, मी फक्त रामासोबत आहे.आगामी काळात काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका असल्या कारणामुळे प्रत्येकजण आपापल्यापरिने राम मंदिराच्या मुद्यावर चर्चा करताना दिसत आहेत. त्याचबरोबर अपर्णा यादव म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीत शिवपाल यादव यांच्या पक्षातून निवडणूक लढण्याची इच्छा आहे. राम मंदिराऐवजी मस्जिद बनले पाहिजे का ? असा प्रश्न विचारला असता रामायणात याच जागेवर मंदिराचा उल्लेख करण्यात आला आहे, त्यामुळे येथे मंदिरच बनवण्यात यावे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दहशतवाद आणि आर्थिक गुन्हे हे जगासमोरील दोन सर्वांत मोठे धोके !

News Desk

शेतकऱ्यांना लवकर कर्ज मिळावे, मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र

News Desk

पश्चिम बंगाल सरकारने हेलिकॉप्टरला परवानगी नाकारल्याने राहुल गांधींची सभा रद्द

News Desk
राजकारण

काँग्रेसने दिग्गज नेत्यांमधील वाद सोडविण्यासाठी नेमली त्रिसदस्यीय समिती

Gauri Tilekar

भोपाळ | यंदाच्या निवडुकीत मध्य प्रदेशात सत्ता मिळविण्यासाठी काँग्रेस पक्षाचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. काल (बुधवारी) राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी काँग्रेस पक्षाची बैठक झाली होती. या केंद्रीय निवड बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या समोरच काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांमध्ये मोठा वाद झाला आहे. ‘आपल्या गटातील उमेदवारांना तिकीट मिळावे’ यासाठी दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात हा मोठा वाद झाला आहे.

दरम्यान या केंद्रीय निवड बैठकीत झालेला वाद इतका मोठा होता कि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना एक त्रिसदस्यीय समिती नेमावी लागली आहे. अशोक गहलोत, वीरप्पा मोईली आणि अहमद पटेल यांचा या समितीत समावेश असून त्यांनी काल रात्री याबाबत बैठक देखील घेतली. परंतु, तरीही या वादावर कोणताही उपाय निघालेला नाही. दरम्यान येत्या ५ नोव्हेंबरपर्यंत काँग्रेस आणि भाजप हे दोन्हीही पक्ष आपल्या सर्व उमेदवारांची नावे जाहीर करणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Related posts

“बेकायदेशीर शिंदे सरकारचे बेकायदेशीर प्रवक्त्याचे पवारांवरील वक्तव्य बेजबाबदारपणाचे”

Manasi Devkar

फैजाबादनंतर आता अहमदाबादचे नामांतर ‘कर्णावती’ होणार का?

News Desk

कर्नाटकात अखेर भाजपचा झेंडा

News Desk