HW News Marathi
राजकारण

सुभाष देशमुख यांची तात्काळ हकालपट्टी करा | सचिन सावंत

मुंबई | महाराष्ट्र राज्याच्या सहकार मंत्र्यांनी आरक्षित जागेवर अनधिकृतपणे बांधलेला अलिशान बंगला हा फडणवीस सरकारच्या भ्रष्ट कारभाराचे ज्वलंत प्रतिक आहे. सातत्याने बेफामपणे वर्तणूक करून सेबी सारख्या यंत्रणांनी दोषी ठरवूनही मंत्रीमंडळात कायम असलेल्या सुभाष देशमुख यांची तात्काळ हकालपट्टी करा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की अनधिकृत बांधकाम करणा-या नगरपालिका सदस्यांचेही सदस्यत्व रद्द होते. परंतु पण आपल्या महाराष्ट्रात राज्याच्या मंत्र्यावर कारवाई होत नाही असे विरोधाभासी आणि दुर्देवी चित्र सध्या पहावे लागत आहे. भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेले अनेक मंत्री राज्याच्या सरकारमध्ये आहेत. पण मुख्यमंत्री त्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालून त्यांना प्रख्यात दर्शवण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहेत. भाजप सरकारने कमरेचे काढून डोक्याला गुंडाळलेले असून मुख्यमंत्री क्लीन चिटच्या चिंध्यांनी लज्जारक्षण करण्याचा अयशस्वी प्रयत्न करित आहेत अशी घणाघाती टीका सावंत यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण राणेबदल मला प्रश्न विचारू नका – चंद्रकांत पाटील

swarit

“सुषमा अंधारे कोण?”, असा सवाल करत प्रताप सरनाईकांची टीका

Aprna

‘कुठे आहेत नोकऱ्या?’ गडकरींना कॉंग्रेस अध्यक्षांचा सवाल

News Desk