HW News Marathi
कृषी

शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा

मुंबई | भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उध्दवस्त झालेले शेतकरी देशभर आंदोलन करत आहेत या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. देशभरात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पब्लिसिटी स्टंट म्हणून संबोधून देशाचे कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी शेतक-यांचा अपमान केला आहे. त्यांनी देशातील शेतक-यांची माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.

केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करताना खासदार चव्हाण म्हणाले की, कृषीमंत्र्यांचे वक्तव्य दुर्देवी असून भाजप नेत्यांची शेतक-यांबाबतची हीन मानसिकता दर्शवणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत शेतक-यांना दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी उध्दवस्त झाला आहे. केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आल्यापासून शेतकरी आत्महत्यांमध्ये ४१.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गेल्या चार वर्षात देशात ४४ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत एकट्या महाराष्ट्रात १५ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. देशभरात दररोज ३५ पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या करित आहेत. युपीए सरकारच्या काळात ४.२ टक्के असणारा कृषी विकासदर आता १.९ टक्क्यांवर आला आहे. आगामी काळात देशातील शेतकरी या मस्तवाल सरकारची मस्ती उतरवतील असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केवळ 15 गुंठे जमीनमुळे मजूर झाला बागायतदार

News Desk

पंतप्रधान मोदी साधणार शेतक-यांशी संवाद

News Desk

वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासकीय यंत्रणांनी प्रयत्नशील – जिल्हाधिकारी डोंगरे 

News Desk