HW News Marathi
राजकारण

आगामी लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपची युती होणारच !

मुंबई | लोकसभा निवडणुकीत शिवसेना आमच्यासोबत असेल, अशा विश्वास भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान व्यक्त केला आहे. शहा यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप-शिवसेना युती कायम राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यापासून भाजप-शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे.

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल भाजपसाठी अनुकूल नाहीत. परंतु या तिन्ही राज्यांतील निकालांचा संबंध आगामी २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जोडू शकत नाही, असे देखील शहा यांनी म्हटले आहे. तीन राज्यांतील निकालांवर आम्ही आत्मपरिक्षण करणार आहोत. तिन्ही राज्यांत जनतेने दिलेला जनादेश आम्ही स्वीकारला आहे. परंतु, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप हिंदी भाषिक पट्ट्यात तसेच अन्य भागांत विजय मिळवून पुन्हा सत्ता मिळवेल, असा दावा देखील शहा यांनी केला आहे.

सर्व विरोधक एकत्र येऊन भाजप विरोधात महाआघाडी स्थापन करणे हा केवळ भ्रम असून सत्य परिस्थिती महाआघाडी अस्तित्वातच नाही, अशा शब्दात शहांनी टीका केली आहे. २०१४ मध्ये विरोधकांना आम्ही हरविले होते. ते सर्व प्रादेशिक पक्षातील नेते आहेत. ते एकमेकांना मदत करू शकत नाहीत, असेही त्यांनी नमूद केले आहे.

भाजपला २०१९ मध्ये पश्चिम बंगाल, ईशान्य भारत आणि ओडिशात फायदा होईल. गेल्या पाच वर्षात मजबूत केलेली राष्ट्रीय सुरक्षा, भ्रष्टाचार कसा कमी केला आदी मुद्दे आगामी निवडणुकीत असतील. केवळ भाजपसाठी नव्हे तर देशात एक मजबूत सरकार सत्तेत येणे गरजेचे आहे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#Results2018 : पाचही राज्यांमध्ये विधानसभांच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात

News Desk

बीकेसीवरील मेळाव्यात एकनाथ शिंदेंनी वाचली भारतीय जनता पक्षाची स्क्रिप्ट! –  नाना पटोले

Aprna

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या चार जागा सोडण्याचा रिपाइंचा भाजपला प्रस्ताव

Gauri Tilekar
देश / विदेश

साडेतीनशे कोटी रुपयांचा फाइन वसूल

News Desk

नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियांने ग्राहकांच्या खिशातून सुमारे साडेतीनशे कोटी रुपये वसूल केले आहेत. हे पैसे केवळ देवाण-घेवाणपोटी वसूल करण्यात आलेल्या दंडातून मिळाले, हे विशेष. तुमच्या खात्यात तीन हजारांपेक्षा कमी रक्कम असेल तर तुम्हाला दंड द्यावा लागतो. तसेच इतर बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास पैसे आकारले जातात. मेट्रो शहरात दीडशे रुपयापर्यंत दंड आकारला जातो. तुम्ही पैसे काढा किंवा काढू नका, तुम्हाला भूर्दंड भरावाच लागणार हे नवे बँकींक धोरण असल्याचे सध्या चित्र आहे. एकीकके शासन बँक व्यवहार करण्यास प्रोत्सहन देत असून दुसरीकडे ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचा धंदी सुरू आहे. एकट्या एसबीआय बँकेने ग्राहकांकडून दंडापोटी साडेतीनशे कोटी वसूल केले आहेत. इतर खासगी बँकांची ही रक्कमो कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

Related posts

जाणून घ्या…देशाच्या राजकारणात अल्पावधीतच महत्त्वाचे स्थान मिळविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल

News Desk

अरुण जेटली यांच्या निधनाने विद्वान, कर्तबगार नेता गमावला !

Gauri Tilekar

बेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे ?

News Desk