HW News Marathi
राजकारण

आगामी लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपची युती होणारच !

मुंबई | लोकसभा निवडणुकीत शिवसेना आमच्यासोबत असेल, अशा विश्वास भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान व्यक्त केला आहे. शहा यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप-शिवसेना युती कायम राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यापासून भाजप-शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे.

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल भाजपसाठी अनुकूल नाहीत. परंतु या तिन्ही राज्यांतील निकालांचा संबंध आगामी २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जोडू शकत नाही, असे देखील शहा यांनी म्हटले आहे. तीन राज्यांतील निकालांवर आम्ही आत्मपरिक्षण करणार आहोत. तिन्ही राज्यांत जनतेने दिलेला जनादेश आम्ही स्वीकारला आहे. परंतु, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप हिंदी भाषिक पट्ट्यात तसेच अन्य भागांत विजय मिळवून पुन्हा सत्ता मिळवेल, असा दावा देखील शहा यांनी केला आहे.

सर्व विरोधक एकत्र येऊन भाजप विरोधात महाआघाडी स्थापन करणे हा केवळ भ्रम असून सत्य परिस्थिती महाआघाडी अस्तित्वातच नाही, अशा शब्दात शहांनी टीका केली आहे. २०१४ मध्ये विरोधकांना आम्ही हरविले होते. ते सर्व प्रादेशिक पक्षातील नेते आहेत. ते एकमेकांना मदत करू शकत नाहीत, असेही त्यांनी नमूद केले आहे.

भाजपला २०१९ मध्ये पश्चिम बंगाल, ईशान्य भारत आणि ओडिशात फायदा होईल. गेल्या पाच वर्षात मजबूत केलेली राष्ट्रीय सुरक्षा, भ्रष्टाचार कसा कमी केला आदी मुद्दे आगामी निवडणुकीत असतील. केवळ भाजपसाठी नव्हे तर देशात एक मजबूत सरकार सत्तेत येणे गरजेचे आहे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

चंद्रकांत खैरे यांचा पराभव हा माझा पराभव !

News Desk

सत्ताधारी नेते इतिहास बदलतील यात जराही शंका नाही म्हणूनच…!

News Desk

#LokSabhaElections2019 : माढा मतदारसंघातून शरद पवारांची माघार ?

News Desk
राजकारण

नारायण राणेंची खासदारकी काढून घेण्याची मागणी

News Desk

मुंबई | “नारायण राणेंना भाजपकडून देण्यात आलेली खासदारकी काढून घेण्यात यावी”, अशी मागणी सिंधुदुर्गातील एका भाजप नेत्याने केली आहे. सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी भाजप प्रभारी सरोजनी पांडे यांच्याकडे नारायण राणेंना भाजपकडून देण्यात आलेली खासदारकी काढून टाकण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग भाजप नेत्यांच्या मनात नारायण राणेंबद्दल नाराजी असल्याचे चित्र दिसत आहे.

सिंधुदुर्गातील भाजप नेत्यांमध्ये नारायण राणेबद्दल असंतोष वाढत चाललेला दिसत आहे. भाजपच्याच कोट्यातून सध्या राज्यसभेचे खासदार असणाऱ्या नारायण राणेंनी त्यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या विश्वास यात्रेच्या वेळी भाजपवर निशाणा साधला होता. त्यामुळे भाजपमध्ये सध्या नारायण राणेविरोधी वातावरण आहे. म्हणूनच भाजपकडून नारायण राणेंना देण्यात आलेली खासदारकी काढून घेण्यात यावी, अशी मागणी सध्या सिंधुदुर्गातील भाजप नेत्यांकडून केली जात आहे.

Related posts

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा : शरद पवार अडचणीत येण्याची शक्यता ?

News Desk

समाजाच्या विकासासाठी मातंग तरुणांनी उद्योग आणि सहकार क्षेत्राकडे वळावे

News Desk

अमित शहांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे जाणार गुजरातला

News Desk