HW News Marathi
राजकारण

शास्त्रीनगर झोपडपट्टीतील रहिवाशांना प्रशासनाची अपुरी मदत

मुंबई | काहीच दिवसांपूर्वी म्हणजेच २७ नोव्हेंबरला बांद्रा शास्त्रीनगर रोड नंबर २ येथील झोपड्यांना भीषण आग लागली होती. या आगीत तब्बल ५८ झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली होती. परंतु ही आग शॉर्टसर्किटने लागली नसून त्यामागचे कारण संशयास्पद आहे. याची चौकशी व्हावी, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. या आगीत जळलेल्या झोपड्यांना प्रत्येकी ५००० रुपये मदत देऊन प्रशासनाने आपले हात वर केले आहेत. या आगीला आज आठ दिवस उलटले आहेत. त्यानंतरही या झोपड्यातील रहिवाशी उघड्यावर राहत आहेत.

“आम्हाला केवळ आमच्या डोक्यावर छप्पर हवे आहे. सरकारने आम्हाला संकटात इतक्या वर्षांच्या मेहनतीचे ५००० रुपये मदत करणे म्हणजे सरकार आमचा जखमेवर थोडेसे औषध लावून बाकी जखम तशीच ठेवत आहे. हे पैसे आम्हाला घर उभारणीसाठी पुरतील का ?”, असा सवाल येथील रहिवाशांनी विचारला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी येथे पाहणी केली असून रहिवाशांना केवळ मदत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, अद्याप कोणतीही मदत केलेली नाही. या लोकप्रतिनिधींना निवडून देऊन आम्ही चुक केली, असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. ही आग इतकी भीषण होती की त्यात संपूर्ण बांद्रा शास्त्रीनगर जळून खाक झाले असते, असे हे रहिवाशी सांगत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पंतप्रधान मोदींच्या ‘या’ विधानामुळे पुन्हा उडाला नेटिझन्सचा गोंधळ

News Desk

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष होते, आहेत अन् राहतील !

News Desk

“अनुराग ठाकूरजी आमची KDMC फक्त सेटिंगमध्ये स्मार्ट…”, मनसे आमदार राजू पाटलांचा टोला

Darrell Miranda