HW News Marathi
राजकारण

स्वबळाच्या नाऱ्याचा फटका शिवसेनेलाच ?

मुंबई | २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात शिवसेनेची घोर निराशा होणार असल्याचे एबीपी माझा-सी व्होटरने आॅक्टोबरमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून सांगण्यात आले आहे. सर्व राजकीय पक्ष स्वतंत्र लढले तरी आजच्या स्थितीत भाजपच २३ जागा जिंकून पहिले स्थान पटकावेल. तर शिवसेनेला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. त्यामुळे स्वबळावर लढण्याच्या शिवसेनेच्या नाऱ्याचा सर्वाधिक फटका हा त्यांनाच बसू शकतो हे या सर्वेक्षणातून स्पष्ट दिसत आहे.

महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती झाली तर भाजपला ३४ जागा तर काँग्रेसला १४ जागांवर मिळतील. मात्र सर्व पक्ष स्वतंत्र लढले तर भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांना २३ जागा, काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांना १४ जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला ६ जागा तर शिवसेनेला सर्वात कमी म्हणजे ५ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर केंद्रात पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येईल, असे या सर्वेक्षणात म्हटले जात म्हटले गेले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोनिया गांधी-स्मृती इराणींच्या भांडणात सुप्रिया सुळेंच्या मध्यस्तीने वाद निवळला

Aprna

साताऱ्यातील भाजपचा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर

News Desk

शरद पवार देणार तिवरे गावाला भेट

News Desk