HW News Marathi
राजकारण

स्वबळाच्या नाऱ्याचा फटका शिवसेनेलाच ?

मुंबई | २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात शिवसेनेची घोर निराशा होणार असल्याचे एबीपी माझा-सी व्होटरने आॅक्टोबरमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून सांगण्यात आले आहे. सर्व राजकीय पक्ष स्वतंत्र लढले तरी आजच्या स्थितीत भाजपच २३ जागा जिंकून पहिले स्थान पटकावेल. तर शिवसेनेला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. त्यामुळे स्वबळावर लढण्याच्या शिवसेनेच्या नाऱ्याचा सर्वाधिक फटका हा त्यांनाच बसू शकतो हे या सर्वेक्षणातून स्पष्ट दिसत आहे.

महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती झाली तर भाजपला ३४ जागा तर काँग्रेसला १४ जागांवर मिळतील. मात्र सर्व पक्ष स्वतंत्र लढले तर भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांना २३ जागा, काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांना १४ जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला ६ जागा तर शिवसेनेला सर्वात कमी म्हणजे ५ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर केंद्रात पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येईल, असे या सर्वेक्षणात म्हटले जात म्हटले गेले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

RamMandir : भीतीपोटी अयोध्येतून हजारो मुस्लिमांचे स्थलांतर

News Desk

कर्नाटकातील कुमारस्वामी सरकारच्या अग्निपरीक्षेला सुरुवात

News Desk

विकास करता आला नाही म्हणून भाजपने राम मंदिराचा मुद्दा उकरून काढला !

News Desk
राजकारण

भाजप उमेदवारांची आज होणार घोषणा

News Desk

नवी दिल्ली | विधानसभा निवडणुकांसंदर्भात भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली आहे . या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. दिल्लीतल्या भाजपाच्या कार्यालयात आगामी निवडणुकीच्या जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा झाली आहे . त्यामुळे भाजपा आज छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणातल्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार हे सूत्रांच्या माध्यमातून कळत आहे. बैठकीत मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणात होणा-या विधानसभा निवडणुकीतल्या उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा झाली आहे.

भाजपने राजस्थानात किमान ८० ते १०० नव्या उमेदवारांना संधी देण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. जवळपास मध्य प्रदेशातील ४० विधानसभा आमदारांना घरी बसवले जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामध्ये काही मंत्र्यांचाही समावेश आहे. तसेच भाजपा जवळपास बारापेक्षा अधिक खासदारांना या विधानसभा निवडणुकीत उतरवण्याची शक्यता आहे.

छत्तीसगडमध्ये १२ आणि २० नोव्हेंबरला दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. मध्य प्रदेश आणि मिझोराम या दोन्ही राज्यात २८ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात, तर तेलंगला आणि राजस्थानमध्ये ७ डिसेंबरला एकाच टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. या पाचही राज्यांचा निकाल ११ डिसेंबरला लागणार आहे.

Related posts

…तर सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरजच पडली नसती !

News Desk

मी नरेंद्र मोदींना देशाचा पंतप्रधान मानत नाही !

News Desk

“औरंगजेब तुमचा कोण लागतो, की तुम्ही ‘त्या’ निर्णयाला स्थगिती देताय?,” राऊतांचा शिंदे सरकारला सवाल

Aprna